
झेंडा उँचा रहे हमारा !!
जगातील प्रत्येक राष्ट्राचा स्वत:चा असा झेंडा आहे. या झेंड्याचे प्रत्येक राष्ट्र संरक्षण करीत असते. याशिवाय राष्ट्रीय सण झेंडा फडकावूनच साजरे केले जातात. जागतिक किंवा आँलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सर्व राष्ट्राचे एकत्र ध्वज फडकावणे हा राष्ट्राचा गौरव समजला जातो. सर्व राष्ट्रे आपल्या ध्वजाला सन्मानाने अभिवादन करीत असतात. झेंडा म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता, सन्मान व प्रतिष्ठा यांचे प्रतिक समजले जाते. ध्वजाचे हे शास्त्र आहे व त्याला इतिहासही आहे.
ध्वजाला इंग्रजीत "व्हेव-सीकोलाँजी" असे म्हणतात. याची उत्पती लँटिन शब्द व्हँवि-सलम शब्दापासून झाली. रोममध्ये प्राचीन काळी प्रार्थनास्थळी चौकोनी पताका टांगून ठेवत. या पताकांना व्हँवि-लम म्हणतात. हिंदुस्थानात वेदकाळापासून भगवा ध्वज अर्थात 'भागवत ध्वज' उभारला जाई. भगवान श्रीकृष्णाने सारथ्य केलेल्या अर्जुनाच्या रथावर पांडव काळात भगवा ध्वजच फडकत होता. अथर्ववेदांत 'पारिजात ध्वज अरूणकेतू' असे उल्लेख आढळतात. प्राचीन काळी ध्वजाची कल्पना अस्तित्वातच नव्हे तर रूढ होती. वेद, रामायण, महाभारत, कौटलिय, अर्थशास्त्र, राजतरंगीजी यासारख्या अनेक धर्मग्रंथातून ध्वजाचा उल्लेख आहे.
भारतातील हडप्पा, मोहेंजोदडोच्या पुरातन सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत उपलब्ध झालेल्या शिक्यावर ध्वजधारी पुरूषांची चित्रे आणि ठसे सापडले आहेत. दगडावर खोदून काढलेल्या चित्रांमध्येही ध्वजाची चित्रे आढळली आहेत. ग्रीस, चीन आणि इराण येथील उत्खननात ख्रिस्तपूर्व ध्वजाची चित्रे आढळली. ध्वज शास्त्रासंबंधी संशोधन झाले असून इंटरनँशनल अँग्रीमेट (१८९९) वार्सिकोना डिव-लेरेशन (१९२१) नँशनल लाँज (१९६२) या ग्रंथात ध्वजाचा इतिहास दिला आहे. कँप्टन इ. एम. सी. बराँक वांग; डब्लू. जी. क्राँप्टन आणि डाँ. व्हिटनी स्मिथ हे तिघे जागतिक कीर्तीचे ध्वज शास्त्रज समजले जातात. जगात ध्वजाबद्दल माहिती देणा-या संशोधन करणा-या संस्था इंग्लंड, फ्रान्स, कँनडा, स्वित्झलँड, जर्मनी, रशिया, अमेरिका या देशात आहेत. मुंबईतही सदानंद बांदेकर हे ध्वजशास्त्री म्हणूनच ओळखले जात असत. ध्वजाच्या संदर्भात अनेक कायदेही करण्यात आले आहेत. भारतीय ध्वजाची परंपरा फारच जूनी आहे. पांडवांचा व त्यानंतर चंद्रगुप्तांचा ध्वज भगवाच होता. छत्रपती शिवाजी महाराजाचा ध्वजही भगवाच होता.
भारताच्या तिरंगी ध्वजाची कल्पना मात्र १९०६ ची गदर पार्टी मधली. या झेंड्याच्या आद्य निर्मात्या मँडम मादाम भिकाजी रुस्तुमजी कामा. १९०७ मध्ये जर्मनीच्या स्टुडमार्ट शहरामध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद आयोजित होती. या परिषदेत एक दिवस प्रत्येक देशाने आपला राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी निश्चित केला. भारतात त्यावेळी ब्रिटीश सत्ता होती. ब्रिटिशांविरूध्द्द त्यावेळी भारतात असंतोष निर्माण झाला होता. स्वत: मँडम कामा राष्ट्रभत्तीने पेटलेल्या, युनियन जँक त्यांना निर्षिध्द्द होता. मँडम कामा काही काळ फ्रान्स मध्ये होत्या. फ्रेंच राज्यक्रांतीच्या तिरंगी झेंड्यावरून त्यांना तीन रंगी झेंड्याची कल्पना सुचली. हिंदुस्थानचा स्वतंत्र राष्ट्रध्वजच फडकविण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी स्वत:ची एक रंगीत साडी फाडून घेतली. त्यातून तिरंगी झेंडा तयार केला. त्यात वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पांढरा, खालचा पट्टा लाल रंगाचा ठेवला. वरच्या हिरव्या आडव्या पट्टयावर आठ पांढरी कमळे होती. मधल्या पट्टयावर 'वंदे मातरम' ही अक्षरे, तर शेवटी लाल पट्टयावर चंद्र-सूर्य चिन्हांकित होते, मधल्या पट्टयावर लिहिले होते."वंदे मातरम" हे तर हिंदूस्थानचे 'राष्ट्रसूत्र' होते.
मँडम कामानी तयार केलेल्या त्या तिरंगी झेंडयावरील रंगही अर्थपूर्ण होते. हिरवा रंग समृध्द्वीचे प्रतीक, हिरवी क्रांती व सुबकतेची निशाणी, पांढ-या रंगाचा पट्टा शांतता, सर्वाशी मैत्री, तर लाल (भगवा) रंग म्हणजे उसळत्या रक्ताचे, साह्याचे, क्षात्र तेजाचे प्रतीक, अशा या झेंड्यावर मध्यभागी भारताचे राष्ट्रसूत्र 'वंदे मातरम' अर्थपूर्ण शब्द होते. असा हा ध्वज मँडम कामांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकविताच टाळ्यांचा कडकडात झाला व त्या दिवसापासून तिरंगी झेंडा हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज होऊन गेला.
होमरूल चळवळीच्या वेळी टिळकांनी तयार केलेल्या ध्वजाच्या एक चतुर्थाश भाग युनियन जँक होते व मध्यावर सप्तर्षीचे तारे होते. अँनी बेझंट या होमरूलच्या संस्थापक होत्या.
१९३१ मध्ये खास ध्वज समिती निवडण्यात आली. या समितीने तिरंगी ध्वजाच्या मध्यावर चरख्यांचे चिन्ह स्वीकारले. तसेच वर भगवा, मध्यभागी सफेद व शेवटी हिरवा रंग असा बदल केला. पुढे चरखा चिन्हांकित तिरंगा ध्वज काँग्रेस पक्षाचा ध्वज ठरला. स्वातंत्र प्राप्तीनंतर मात्र तिरंगी ध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र आले व हा ध्वज भारताचा अधिकृत ध्वज झाला. हा ध्वज 'हिंदुस्थानचा मानबिंदू' ठरला. आपले शासकीय व राजकीय पदाधिकारी राष्ट्रध्वजाशी आणि ज्याचे प्रतीक आहे त्या लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत असतात.
ध्वजाचे नऊ प्रमाणित आकार आहेत. आँर्डनन्स व-लांदीम फँव-टरी शहाजपूर (उत्तर प्रदेश), खादी ग्रामोद्योग (नवी दिल्ली) आणि खादी ग्रामोद्योग कमिशन (मुंबई) या तीनच ठिकाणी स्वतंत्र भारताच्या तिरंगी ध्वजाची निर्मिती केली जाते.
भारताचा राष्ट्रध्वज झालेल्या तिरंगी झेंड्याला हे पद प्राप्त होण्यासाठी जनतेला ब्रिटिशांच्या दडपशाही विरोधात दीर्घकाळ आदोलन करावे लागले. भारतीय स्वतंत्र संग्रमात तर झेंडा घेऊनच मिरवणुकी काढल्या जात. १९२३ साली वल्लभाई पटेलांनी नागपूर येथे ब्रिटीशाच्या विरोधात तिरंगी झेंडा घेऊनच मिरवणूक काढली. आजचा हा तिरंगा ध्वज धर्माधिष्ठित नसून भावनेला आव्हान करणारा आहे. या प्रसंगी स्वातंत्र्यवीरांना श्रध्द्वांजली अर्पण करून आपण म्हणू, "झेंडा ऊंचा रहे हमारा"!
(राष्ट्रध्वज मानलेल्या तिरंगी झेंड्यास आपण अभिवादन करतो. १५ आँगस्ट, २६ जानेवारी, महाराष्ट्र दिनी. अशा या तिरंगी झेंड्याचा उदय कसा झाला? कोणी केला? केव्हा केला? याविषयी.....)
--- सुनिल गोपाळ पांचाळ ---