मनःशांती ते मनशक्ती !!

मनःशांती ते मनशक्ती !!

         मानवाला जन्म पुर्ण करताना मनशांती-मनशक्ती हवी असते. गरीबापासून श्रीमंतापर्यत प्रत्येकाला मनशक्ती कशी मिळेल हाच प्रश्न भेडसावत असतो. प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब सुखी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. जन्मपूर्व अवस्थेतून तीन वर्षापर्यतचा कालखंड मुलांना घडविण्यासाठी उपयुक्त असतो. मुलांचा स्वभाव, वर्तन, दव्यव-तीमत्व, विविध क्षेत्रातील बुध्दीमता या सगळ्यांचा सकुंल विचार मुलांना घडविण्यासाठी आवश्यक असतो. पाल्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती करणे पालकांचीच जबाबदारी ठरते. आपल्या मनाला शिकवा व आपल्या मेंदूमध्ये योग्य बदल घडवा. मन हे मेंदूपेक्षा वेगळे आहे. योग्य संस्कार- विचार मनावर पक्के बिंबवले की ज्ञान बिंबवणे सहज सोपे जाते. 

          तणाव भयापासून मुक्त करते ते ज्ञान, सध्याच्या दुषीत वातावरणात आजच्या पिढीला घडविण्यासाठीचे मुख्य धैर्य म्हणजे पुढच्या पिढीचा सर्वांगीण विकास. आपली प्राचीन संस्कृती, सायन्स यांचा पूर्वजानी घातलेला मेळ या बरोबरच प्रयत्नाचे पाऊल पुढे टाकायचे आहे. आणि सर्वांगीण विकासाच्या वाटचालीकडे जावयाचे आहे. प्रार्थना करा. ज्योती ध्यान करा. त्यामुळे वातावरणातून वैचारिक शुध्दी आपणा सर्वाना प्राप्त होईल.

          टाळू न शकणारी गोष्ट सुखद करायची आहे. शेवटापासून पुन्हा सुरूवात करण्यासाठी निवृत्ती नंतरची संभाव्य पोकळी सामाजिक कार्यात रस घेवून, समाधानी आयुष्य जगण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय गुंतवायच आहे. दु:ख जाणीवपूर्वक सहन करून मनाला समजावून सहनशीलता वाढवायची जी कारण निर्माण करायची ती चांगली करा. परिणाम चांगले निपजतील. उतारवयात शरीराची शक्ती कमी होते. पण मनाची शक्ती कायम ठेवणे आपल्या हाती असते. माणूस म्हणजे मन अधिक शरीर. श्रमाचे आनंद घ्या. त्यातून शुभेच्छा आर्शिवाद मिळतात. विचारांची शक्ती मिळते. तुम्ही सुखी आहात पण समाधानी आहात काय? याचे उत्तर नाही. सुखासमाधानाने आपल्या टोपलीत विश्रांती घेत असलेला श्रमिक (कष्टकरी) तर सर्व सुख असताना ही सुखा-समाधानाने विश्रांती घेऊ न शकणारा व्यावसायिक, कस्टडीत असलेला गुन्हेगार, त्यांच्या कस्टडीबाहेर पहारा देणारा पोलीस पहारेकरी. तसेच दुरदर्शन वर दाखविण्यात येणा-या सिरीयल, कशा-कशातून समाजाची स्थिती, सुखाची सर्व साधने असतानाही समाधानी जीवन जगत नसणारी माणसे पहायला मिळतील. यासाठी सामुहिक समाधानाचा मार्ग एकत्रित शोधण्याची गरज आहे. आर्थिक वाढीचा दर वाढला तरी समाधानाचा दर वाढायला हवा. मानव समाधानी व्हावा यासाठी समाजहित व राष्ट्रिय हित सुध्दा जपायला हवे.

          समाधानाचे मुळ धर्मात आहे. मनावरती विजय मिळविण्यासाठी समस्येपासून मुक्ती मिळविणे काळाची गरज आहे. जो देतो तो देव, सुख समाधानासाठी ईश्र्वरावर श्रध्दा ठेवा. त्याची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करा. शिक्षित डाँक्टर, इंजिनियर, तरूण-तरूणी आत्महत्या करीत आहेत. यांचे संशोधन व्हायला हवे. 

        प्रकाश वेगापलीकडे जाते ते मन. सुखाबरोबर दु:खही भोगायची असतात. जीवन म्हणजे हालअपेष्ठा, सुख मिळविण्यासाठीची धावपळ त्या प्रेरणेतून गती वाढते. न्युटनच्या तिस-या नियमानूसार प्रत्येक गती त्याच तिव्रतेने प्रतिगती निर्माण करते. सुखी होण्यासाठी त्यामागील समाधान शोधा. कुटुंबाची शांती ही समाधानी जीवनाचे प्रतीक आहे.

         धन आधार देणार नाही. जोडलेली माणसे तुम्हाला आधार देतील. यातून जीवन समाधानी होऊ शकते. तटावरती जो उभा राहतो तो तटस्थ. विठोबा हे त्याचे उत्तम प्रतिक आहे. तटस्थपणे काठावरती उभे राहून भर समुद्रातील प्रवाहाकडे पहात असतो. तो प्रवाह म्हणजे आपले जीवन होय. असा जन्म लाभावा. देह संपला तरी सुंगध दरवळत राहावा.

            --- सुनिल गोपाळ पांचाळ ---


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week