गणेशोत्सव पावित्र्याने साजरा व्हावा !!

गणेशोत्सव पावित्र्याने साजरा व्हावा !!

          करोना काळामध्ये दोन वर्ष उत्सवाला बंदी होती. आता सरकारने सर्व प्रकारचे निर्बंध मागे घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. सर्वत्र उत्साहाने, आनंदाने, जल्लोषाने गणेशोत्सव सुरु होणार. तत्पूर्वी पाटपूजा, पदपूजा मूर्तीचे फक्त पाय, आशीर्वाद देणारा हात सोन्या चांदीचे होत आहेत. हे कोणत्या पुराणात, धार्मिक ग्रंथात लिहिले आहे ?

गणेशउत्सव हा आता इव्हेन्ट/प्रसिद्धीचा चा जमाना असल्यामुळे गल्ली गल्लीत राजे, महाराजे नवसाला पावणारे गणपती होत आहेत. त्याच्या दर्शनाला लांबच लांब रांगा लागत आहेत. ह्या मध्ये प्रत्यक्ष णपती समोरील दानपेटीत पैसे टाकण्यासाठी पडदे लावण्यात येत आहेत.

      परंतु आपण आपल्या घरी आणलेला गणपती ज्याची आपण पवित्र्याने, प्राणप्रतिष्ठा करून ५/१० दिवस नोभावे पूजा, सेवा करतो. मग तो आपल्यावर प्रसन्न/ नवसाला पावत नाही का ? त्याकरिता सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जावयास पाहिजे का ? गणपती आगमन आणि विसर्जनाच्या वेळी आपण डीजे लावून कोणत्या प्रकारची गाणी लावतो, कश्या प्रकारे नाचगाणी, धांगडधिंगाणा घालतो. त्यात वाहुतुक कोंडी करताना ऍम्ब्युलन्स आल्यावर मार्ग मोकळा करून पोलिसांना सहकार्य करतो का?

      हिंदू धर्माचा अभिमान बाळगताना न्यायालयाला उत्सव कश्याप्रकारे साजरा करावा या करीता हस्तक्षेप करण्याची, आदेश देण्याची संधी न देता लोकमान्य टिळकांना लोक जागृतीसाठी अभिप्रेत असलेला

गणेशोत्सव पावित्र्याने साजरा व्हावा !


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week