लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरच धन्य जहालो ऐकतो मराठी !
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरच धन्य जहालो ऐकतो मराठी २७ फेब्रुवारी मराठीतील एक सुप्रसिध्द कवी लेखक कादबंरीकार नाटकार आपले सर्वांचे लाडके कवीवर्य विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्म दिवस खरंतर देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन आणि मराठी जागतिक भाषा दिन मोठ्या ऊत्साहाने शाळा महाविध्यालयात साजरा केला जातो खरं तर मराठी भाषेमुळे एक प्रकारचा आत्मियता तयार होतो. कारण मायमराठी भाषेने बोलायला शिकवलं मराठी भाषेने आपल्याला वागायला शिकवलं मराठी भाषेने आपल्यवर संस्कार केले माञ आज २१साव शतक आहे आणि या २१साव्या शतकामध्ये आमची ही मातृभाषा म्हणजेच मराठी भाषा कुठेतरी दुय्यम होत चालली आहे म्हणजे दुय्यम म्हणन्यामागची कारणे आपण शोधतो तेव्हा खर्या अर्थाने आमचे पुर्वज असे सांगतात की जर का एखाद्या भाषेचा विकास व्हायचा असेल किंवा ऊदय व्हायचा असेल तर ती भाषा आपल्या पिढीपासुन पुढच्या पिडी पर्यंत मिळाली पाहीजे माञ नेमक या मराठी भाषेच्या विरुद्ध वेगळच काहीतरी होताना दिसतय मराठी भाषा तर आमचे पुर्वज वापरायचे मराठी बोली भाषा ही आमच्या पुर्वजांची बोली भाषा होती माञ आजच्या या नव्या पिडीमध्ये मराठी भाषा खरच या ईग्रजी भाषेच्या प्रभावामुळे लयास चाललेली दिसते त्यामुळे खर्या अर्थांने २७ फेब्रुवारी हा दिवस या मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यापुरताच मर्यादित नाही तर या मराठी भाषेला जी काही वैभव संपन्नता प्राप्त करुन दिलेली आहे मग आपणपाहु शकतो वि स खांडकरांनपासुन ते नेमाडे पर्यंतचे १ ज्ञानपिठ विजेते कवी लेखक साहीत्यकार या मराठी भाषेने दिलेले आहेत ही मराठी भाषा सर्व भाषेंच खरयाअर्थाने मुळ समजली जाते माञ याच मराठी भाषेच सुदंर वर्णन करु तेव्हा अस लक्षात येत की ही मराठी भाषा अ म्हणजे अज्ञानापासुन सुरू होते आणि ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत जाऊन पोहोचते.
आज आमची पोर या मराठी भाषेचा विचार करत असताना आई ऐवजी मम्मी म्हणु लागली बाबा ऐवजी डॅडी म्हणुन बोलत आहेत यातुनच या मराठी भाषेचे आपण मारेकरी आहोत की काय? अशी आम्हाला भीती वाटायला लागली आहे.त्या मुळे मराठी बांधवाना मराठी भाषा दिना निमीत्ताने विनंती करतो की खरच अकराव्या शतकामध्ये विवेकसिंधु नावाचा ग्रंथ सापडला आणि या मराठी भाषेचा ऊदय झाला आज २१ साव्या शतकामध्ये लुप्त पावत चाललेल्या मराठी भाषेला पुन्हा एकदा आपण सगळ्यांनीच वैभवसपंन्नता आणन हे अत्यंत गरजेच आहे असच मला या ठीकाणी वाटतं कवीवर्य कुसुमाग्रज खरं तर ओळखलात का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते गर्मलेले केसावरती पाणी याच्या पुढेही जाऊन खिषाकडे हात जातात सर पैसे नकोत सर जरा एकटे पणा वाटला मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा ही कणा कविता असेल किंवा सरवात्मका शिवसुदंरा स्विकार या अभिवादना तिमीरातुनी तेजा कडे प्रभु ने आमच्या रे जिवना ही असेल किंवा एखाद्या माणसाच्या जिवनातल वास्ताविक चिञण नटसम्राटासारख्या नाटकात चिञीकरण करुन अक्षरशा मराठी माणसांच्या डोळ्यातुनअश्रु काढणे ईतक सामर्थ्य हे कवीवर्य कुसूमाग्रज यांच्या लिखानात होत अशा या महान लेखकाला मी या ठीकाणी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या सर्व बांधवाना हार्दिक अशा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय मराठी
(श्री.गणेश अनंत नवगरे ~ अंधेरी पश्चिम)