
पाळी मिळी गुप चिळी..
(वार्ताहर - प्रिती जाधव) मासिकपाळी एक गाढ अंधश्रद्धा.... ति चा अनभिज्ञ प्रवास..
प्रॉब्लेम ??? की अडचण ??? बापरे...! इतकी भयानक आहे का ही?? खरंतर प्रत्येक स्त्री ला निसर्ग नियमाने मिळालेली देणगीच आहे ही...
जेंव्हा खूप खोलात जाऊन विचार करतो तेंव्हा लक्ष्यात येते की कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी कवटाळून जगतो आहोत आपण ?? पण ह्याची मूळ खोलवर रुजली आहेत.. स्त्री ला अस्वच्छ अपवित्र समजणे, अगदी पिढ्या न पिढ्या निसर्गनियमाने स्त्रीच्या बाबतीत घडणाऱ्या शरीराच्या महत्वाच्या कार्याला रूढी परंपरा नी धार्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक शाप च दिला आहे जणू काही ...!!
एखाद्या मुलीला लहान असल्या पासून च बाई पणाचे धडे शिकवले जातात... लहान पण पासूनच हे सर्व मनावर कोरले जाते...
कित्ती सहज आपण मासिक पाळीला problem
अस म्हणतो पण सत्य हे आहे की पाळी येणं हा प्रॉब्लेम नाही तर ठरल्या वेळी पाळी न येणं हा खरा प्रॉब्लेम आहे.. ..नैसर्गिक रित्या शरीरक्रिया विषयी अशा नकारात्मक भावने वर आपण लोकमान्यते ची मोहोर उमटवतो.. खरंतर मासिक पाळी ही काही मलमुत्र विसर्जन सारखी शरीरातील घाण बाहेर टाकणारी उत्सर्जक क्रिया नाही..
पाळी आलेल्या बायकांच्या साठी वेगळी जागा, वेगळं अन्न, चार दिवस बाजूला बसणं, पूजा अर्चा धार्मिक कार्य तर लांबच ..आणि हे सर्व म्हणजे रूढी परंपरा चा परिपाक .. आपल्या कडे पाळीच्या दिवसांचे समर्थन करणाऱ्यांची अजिबात कमी नाही ...आदर भावने तून , ऋणभावनेने मिळालेली नाही तर अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती.. ति च्या प्रती कृतज्ञता, सन्मान कुठेही नसतो..
पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्या त्या मागचं विज्ञान बाजूला ठेवून आपण शरीराबाबतच्या पाळीच्या पारंपरिक कल्पना दृढ करण्या साठी वापरतो ..एकविसाव्या शतकातील हीच आपली प्रगती, वैज्ञानिक दृष्टी ??
खरंच म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतो.
चला मैत्रिणींनो आणि मित्रांनो आणि कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करुया .. पिढ्यान् पिढ्या मनामनात बुरसटलेली ही विकृत मानसिकता सोडून आपणा पैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वतःच्या परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टिने पाहण्याचा, जगण्याचा अंगीकार करू ...