चुकीला माफी नाही !

चुकीला माफी नाही !

    महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात कोरोना बाधित व्यक्तीच्या संख्येत भर पडत आहे. याचे कारण असे की, सरकारी यंत्रणेने आता रुग्ण येण्याची वाट न पाहता रुग्णापर्यंत पोहोचण्याचे खूप मोठे धाडसी पाऊल उचलले आहे. एखादी व्यक्ती कोरोना बाधित असेल तर त्याव्यक्तीच्या कोण कोण संपर्कात आले आहेत याचा छडा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सरकार करीत आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णाच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे. जेव्हढे म्हणून रुग्ण आढळतील त्यांची तीन टप्प्यात विगतवारी म्हणजे आयडेंटिफिकेशन करून त्यांचेवर उपचार करण्याचे काम प्रशासन करीत आहे. त्याबद्दल केंद्र सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र्र सरकारचे अभिनंदन करावेच लागेल.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मंत्रीमंडळाची बैठक घेतली आणि त्यानंतर आज त्यांनी जनतेला उद्देशून आपले मनोगत मांडले. मुख्यमंत्र्यांचे मनोगतील भाषण हे महाराष्ट्रातील जनतेला शास्वत करणारे होते. सरकार काय करत आहे आणि जनतेने काय केले पाहिजे हे सांगत असतांना त्यांनी कोरोनाव्याधी शून्यावर आणण्याचा आत्मविश्वास दाखवला. तसेच लॉकडाऊन नंतर राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ही त्यांनी भाष्य केले. २१ दिवसाच्या लॉकडाऊन नंतर नक्कीच त्याचा उद्योग धंद्यावर परिणाम होणार आहे. त्यावेळी सरकार म्हणून आपण जनतेच्या मागे खंबीरपणे उभे राहू याचे भान राखत हिम्मत राखण्याचे  आवाहन त्यांनी केले आहे. 

    आज सर्व अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, वैधकीय कर्मचारी, पोलीस,  यांचं बरोबरच सफाई कामगार, पोस्टमन, गॅस सिलेंडर पुरवठा करणारे कर्मचारी, घरोघरी वृत्तपत्रे टाकणारे वितरक यांचाही आरोग्याचा दृष्टीने शासनाने  विचार केला पाहिजे. अशीही काही समाजसेवी संस्थाची मागणी आहे.  सरकार बाबत नक्कीच विचार करील याबाबत दुमत नाही. 

    पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करतो याचा अजूनही काहीजनानी विचार केलेला दिसत नाही. आपल्या देशात कायदे आहेत पण आपण स्वयंशिस्त नाही. अशा काही बेशिस्त  मूठभर लोकांमुळे शिस्त पाळणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. मला काय त्याचे. मला काय होणार आहे अशी या देशद्रोही लोकांची धारणा आहे. या बेशिस्त लोकांचे असेच चालू राहिले तर मात्र त्याचे दूरगामी परिणाम लॉकडाऊन वाढण्यात, तसेच देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच होतील. मग त्यावेळी मात्र चुकीला माफी नसेल. त्याचे दुष्परिणाम तुमच्या आमच्या सारख्या प्रामाणिकपणे सरकारचे आदेश पाळणाऱ्या देशप्रेमी नागरिकांना विनाकारण भोगावे लागणार आहेत.

चंदू धुरी

कार्यकारी संपादक

दै. सत्यवार्ता


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week