फुलपाखराबरोबर वनिता अखेर सरणावर गेली !!

फुलपाखराबरोबर वनिता अखेर सरणावर गेली !!

   (ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) मुख्य महामार्गावरुन भितीदायक आवाज करत ती रुग्णवाहिका चेंबुर वाशीनाका येथील शहाजीनगर येथे आली. तिथे असणाऱ्या बुध्दविहारामागील दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या घरातील नातेवाईक व परिसरातील लोकांजवळ रुग्णवाहिका उभी राहीली. शोकाकुल वातावरणात वनिताचा मृतदेह रुग्णवाहिकेतुन बाहेर काढला. रुग्णवाहिका निघुन गेली. वनिताच्या प्रेताजवळील नातेवाईकांमध्ये एक गंभीर चर्चा सुरु झाली. हि आमची वनिताच का??? ... कुटुंबियाबरोबरच गर्दीतील सर्वजणही गोंधळलेले होते. कारण गोरीगोमटी सुंदर दिसणाऱ्या वनिताचा तो मृतदेह वाटत नव्हता. वनिताचा चेहरा खुपच विद्रुप दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर मारहाण करुन केमीकल टाकले असावे असा संशय काही जाणकारांना आला. मात्र हे प्रेत वनिताचे आहे हे अखेर स्पष्ट झाले. वनिताच्या हातावर गोंदलेल्या फुलफाखराने वनिताच्या नातेवाईकांना तिची खात्री पटवुन दिली. फुलपाखराबरोवर वनिता अखेर सरणावर गेली. अनंतात विलिन झाली, मात्र मागे ती एक गोष्ट ठेवुन गेली, बदनामीची गोष्ट. 

          काय आहे वनिताच्या बदनामीची गोष्ट? तिचा चेहरा कुणी केला विद्रुप? कुणाच्या संगतीमुळे वनिता झाली बदनाम? आदी प्रश्नांची उत्तरे शोधली असता एक भयाण वास्तव समोर आले.

       बाई, बाटली अन पैसा यापासुन जर कोणी वेळीच सावध झाला नाही तर त्याच्या जीवनाची राखरांगोळी होते. संत महंतांनी याबाबत मोठे प्रबोधन करुनही काहीजण या वाकडया वाटेचा स्विकार करतात. कुटुंबातील एकानेही जर या वाकडया वाटेचा स्विकार केला तर त्याचे परिणाम सर्व कुटुंबांना भोगावे लागतात. समाजात त्या कुटुंबाला एक बदनामीचे लेबल लागते.

         मुळ बीडची असणरी वनिता चेंबुर वाशीनाका येथे शाहुनगर मध्ये राहत होती. आईवडील सोबत होते. वनिता ७ वी पर्यंत जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली. वनिताचा नवरा ज्ञानेश्वर सैन्यात होता. काही काळ वनीता दिल्लीत नवऱ्याबरोबर होती. वनिताचा एक मुलगा ८ वीत व एक मुलगी ७ वीत होती. पाहताक्षणी कोणालाही आवडणारया वनिताचा संसार सुखाचा चालला होता. शेजारच्या गल्लीत राहणारी वनिताची मैत्रीण महानंदा एक दिवस रेशनदुकानवर जायचे आहे म्हणुन तिला घराबाहेर घेवुन आली व एका गोऱ्यागोमटया पैशेवाल्या रावसाहेब दुसिंग याच्याशी ओळख करुन दिली. आणि मग सुरु झाला नियतीचा खेळ..... दागिन्याने वाकलेला, पैसेवाला रावसाहेब आणि वनिता सर्वांसमोर कुठेही फिरायला जावु लागले. रावसाहेबचा फोन आला की वनिताला दिवसरात्र कळत नव्हते. धनसिंग वनिताला धमकी द्यायचा. मारुन टाकेन तुझ्या भावाला, आईला. म्हणुन वनिता त्याचा फोन आला की रात्रीअपरात्री लगेच रावसाहेबला भेटायला जायची, सदैव घाबरलेली असायची. 

        रावसाहेब दुसिंगला दोन मुलगे व एक मुलगी. सायन कोळीवाडा येथे राहणारा रावसाहेब याने ज्या दिवशी वनिताला संपवले व स्वताही गळफास लावुन घेतला त्या अगोदर पुण्याला भावाकडे गेलेल्या वनीताने ५ जुनला मुलीला वाढदिवसानिमीत्त फोनवरुन विश केले. मात्र ती वाढदिवसाला कायमचीच येवु शकली नाही.  

         वनिताच्या नवऱ्याला हा सर्व प्रकार माहिती होता. देव माणुस आहे वनिताचा नवरा असे लोक बोलत होते. मिलेट्रीत असणारा वनिताचा नवरा व रावसाहेब यांची अनेकवेळा या प्रकरणावरुन वाद होत पोलिसांत तक्रार झाली होती. पोलिसही यांच्या प्रेमप्रकरणाला वैतागले होते. दिवसाढवळया समाजात असे प्रकार करणाऱ्या या दोघांना काही लाज आहे की नाही. अशा शब्दात पोलिस बोलायचे. रावसाहेबने माहुलला आंबाफाटा येथे भाडयाने घर घेतले होते. त्या ठिकाणी दोघे भेटायचे कधी लॉजवर भेटायचे.  

         नवीन पनवेल भागातील वीरपार्क हॉटेल लॉजींग मध्ये १०४ रूममध्ये रावसाहेब ने हे भयानक कृत्य केले. गेल्या १० वर्षापासुन प्रेम करणारा आपला प्रियकर आपला ऐवढा कुरपणे अंत करेल असे वनिताला कधी वाटलेही नसेल. लॉजमध्ये जाण्यापुर्वी रावसाहेबने दोन पेट्रोलजन्य पदार्थाच्या बाटल्या, एक लिटर थिनरचा कॅन, नायलॉनची दोरी सोबत घेतली होती. रावसाहेबने वनिताचा गळा आवळुन ठार केले व रावसाहेबने फास लावुन आत्महत्या केली. सकाळी लॉजची चेकआउटची वेळ असताना दोघेही बाहेर येत नाहीत व कडी काडत नाहीत हे लक्षात येता लॉज मालकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा फोडला असता दोघांचे मृतदेह पोलिसांना दिसले. रावसाहेब गळफास घेतलेल्या स्थितीत तर वनिता मृतावस्थेत दिसली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात रावसाहेबने वनिताच्या डोक्यात खुर्चीने मारहाण करत दोरीने गळा आवळला होता. असे स्पष्ट आहे. रावसाहेबवर खुनाचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

          अशा या लग्नांनंतरच्या प्रेमप्रकरणात वनिता व रावसाहेब यांच्या कुटुंबियांना बदनामीच्या वाटेवर आणुन सोडले आहे. सातजन्मी हाच पती मिळावा असे बोलत लग्नाच्या बेडीत अडकायचे व लग्नांनंतर अशा प्रकारे कुरपणे जीवनाचा शेवट करायचा. सर्वांच्या नजरेतुन उतरले तरी चालेल मात्र कुटुंबाच्या नजरेतुन उतरले नाही पाहिजे. हाच एक बोध वनिता व रावसाहेब देवुन गेले असावेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week