गुजरातला हजार कोटी ची मदत मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक का ? महेश भारत तपासे !!
गुजरातला हजार कोटी ची मदत मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक का ? महेश भारत तपासे !!
दोन दिवसा आधी आलेल्या तौकते चक्रीवादळाने केरळ महाराष्ट्र आणि गुजरात या तीनही राज्यात थैमान घातले. महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे व नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी गुजरात राज्याला सढळ हस्ते 1000 कोटी रुपयांची मदत केली, परंतु महाराष्ट्रात झालेली हानी ही त्यांना दिसली नाही. कोकणातल्या माणसावर नरेंद्र मोदी सरकारने अन्याय केला आहे. देशाचे पंतप्रधान राज्याराज्यांमध्ये भेदभाव करतील ही अपेक्षा नव्हती. वास्तविक सगळ्यांनाच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब देतील ही अपेक्षा होती परंतु जिथे सरकार तिथेच मदत कदाचित अशी भाजप सरकारची भूमिका असावी. महाराष्ट्रातील महा विकास आघाडी कोकणातल्या शेतकरी बांधव व नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे.
असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. महेश भारत तपासे यांनी सांगितले.