
मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची भरती करा !
पालिकेच्या २४ वॉर्ड मध्ये जलाशय, उद्याने, रुग्णालये, स्मशानभूमी व इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक काम करतात, पण आजच्या परिस्थितीनुसार सुरक्षा रक्षक स्त्री व पुरुष भरती न झाल्यामुळे अतिरिक्त भार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येतो, त्याशिवाय उद्याने, जलाशय, स्मशानभूमी चा परिसर मोठा असल्यामुळे तेथे कार्यरत असलेले कर्मचारी अपुरे पडत असल्यामुळे काही ठिकाणी चोरीचे, गर्दुल्ल्यांचे, दारूड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. याच गंभीर बाबींची दखल घेऊन सामाजिक विषयासाठी अग्रेसर असलेले वरळीतील शिवसेना युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याकडे यासंदर्भात प्रमुख कामगार अधिकारी, प्रमुख सुरक्षा अधिकारी व संबंधितांकडे संयुक्त बैठक घेण्याची मागणी निवेदनातून केली आहे.