वरळी कोळीवाड्यात उद्रेक होण्या आधीच सांभाळा !

वरळी कोळीवाड्यात उद्रेक होण्या आधीच सांभाळा !

    वरळी कोळीवाड्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे त्या परिसराचे विलगीकरण्यात आले आहे. परंतु तेथील नागरिकांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याने ते भीषण परिस्थितीत सापडले आहेत. या नागरिकांच्या अत्यावश्यक सेवा कोणत्याही प्रकारे चालू ठेवण्याची नितांत गरज आहे. अन्यथा त्याबाबत अत्यंत टोकदार गंभीर प्रतिक्रिया उमटू शकतात. कदाचित नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊन मूळ विधायक उद्देशच उद्ध्वस्त होऊ शकतो.

     ताटाखालच्या मांजरालाही जर एखाद्या खोलीत जबरदस्तीने कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याही आपल्या विरोधकाच्या नरडीवर झडप घेते. शेवटी कुणालाही आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रिय काहीच नसते. म्हणूनच तेथील शांततेचा भंग होऊ नये म्हणून प्रशासनाने त्या़ंच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरीत पावले उचलणे आवश्यक आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे कृती दल स्थापन करुन हा प्रश्र्न सोडविणे सहज शक्य आहे.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week