वाॅटर टॅक्सी जलवाहतूक मार्गाचे स्वागत व्हावे !!

वाॅटर टॅक्सी जलवाहतूक मार्गाचे स्वागत व्हावे !!

          काही नवीन प्रकल्प उभारण्याचा प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्रात त्या विरोधात कुणी ना कुणीतरी उभे राहणार हे ठरलेलेच. नव्या सुधारणा सहजपणे स्वीकारण्याची आपल्या समाजाची मानसिकताच नाही, मग त्या सुधारणा सामाजिक असोत की आर्थिक. बेलापूर ते भाऊचा धक्का हा वॉटर टॅक्सीने जलवाहतूक सुरू करण्याचा प्रकल्प असाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. तरीही हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार नेटाने पुढे रेटीत लवकरच प्रत्यक्ष अमलात आणण्याच्या तयारीत आहे हे विशेष.

       या प्रकल्पाचा खर्च सर्वसामान्य गरीब जनतेच्या खिशातून कररूपात गोळा होणाऱ्या पैशातून केला जात आहे. परंतु या जलमार्गाचा महागडा तिकीट दर गरीब जनतेला परवडणारा नसल्यामुळे तो निरुपयोगी आहे, हा या प्रकल्पाच्या विरोधातील मुख्य आक्षेप आहे. जो प्रकल्प श्रीमंतापासून तळागाळापर्यंतच्या सर्व लोकांच्या उपयोगी पडतो तो सर्वोत्तम प्रकल्प असा सर्वसाधारण निकष असला तरी एखादा दुसरा प्रकल्प सर्वोत्तम प्रकल्पास पुरक ठरत असूनही त्याचे महत्त्व कमी मानून चालल्यास आपली प्रगती जागच्या जागी थिजून जाईल. म्हणून अधिकच्या जलवाहतूक मार्गाचीही आपल्या प्रगतीसाठी गरज आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का या मार्गावरील वाॅटर टॅक्सीमुळे अन्य मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होईल. तसेच या प्रकल्पांतर्गत हजारो गरीबांना रोजगार उपलब्ध होईल. या मार्गावर नवीन उद्योग धंदे उभे राहतील. या नवीन उद्योगांना पुरक असलेले आणखी लहान लहान उद्योग आणि रोजगार उपलब्ध होतील. त्यातून सरकारलाही वाढीव महसूल मिळून तो राज्याच्या अधिकाधिक विकासासाठी उपयोगात आणता येईल. म्हणून आपण या होऊ घातलेल्या वाॅटर टॅक्सी जलवाहतूकीचे स्वागतच करावयास हवे.

 - अशोक सावंत

संपादक  : समुद्र, हेलोसखी, लालबाग


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week