आयुष्य पेलताना...

आयुष्य पेलताना...

आयुष्य पेलताना...

    आपल्या आयुष्याचा पट नियतीने अगोदरच मांडून ठेवलेला असतो.. आणि सोंगट्याही तिच्या हातात असतात. पण कुठलेही दान पडले तरी ते आपण कसे स्वीकारावे,किंवा त्या क्षणी कसे वागावे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते..सुखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांना सामावून घेऊन...त्या विधात्याचे आभार मानून..जमिनीवर पाय ठेवून राहणे गरजेचे असते असे मला वाटते.

    पण आपली आपल्याशी किंवा इतरांशी ही खरी ओळख खडतर प्रसंगी होते..अशा वेळी अगदी तुम्हीं ज्यांना आपले मानलेले असता त्यांचे खरे रंग दिसून येतात...तर कधी ज्यांच्या कडून काही अपेक्षाच नसते...किंवा ते तुमचे कोणीच नसतात ते पाठीशी राहतात..संकटात किंवा कोणत्याही परिस्थितीत कष्टाला हसत सामोरे जात,आपली  संस्काराची मुळे घट्ट ठेवून कुटुंबालाही सावरणे तसेच आपला प्रामाणिक पणा न हरवू देतात ताठ उभे राहणे म्हणजे आयुष्य पेलणे असे मला वाटते..

   बाकी काहीही येते अन् जाते...पण तुमचा खरेपणा ,चांगुलपणा कधीही पुसला जात नाही..हे मात्र नक्की..

   माझी श्री कृष्णा वर खूप श्रद्धा असल्यामुळे कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीत पटकन त्याचे नाव तोंडात येते..त्यावेळी माझा भाऊ मला नेहमी म्हणतो...की श्री कृष्णाने त्याचेही कर्म हसत स्वीकारले..तुला तो संकटातून कसा सोडवेल...आणि हे मला पटते आणि मान्यही आहे..पण त्याचे अस्तित्व वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात मला सुखदुःखाच्या क्षणी नेहमी बरोबर असल्याचे जाणवते..ही त्याची मिळणारी साथ माझ्यासाठी खूप अनमोल आहे...

    आता खूपसे आयुष्य सरून गेले आहे...समाधानी संध्याकाळ समोर आहे..पण पुढचे काहीच माहीत नाही जे असेल ते आनंदात स्वीकारायचे आणि त्यात तो श्रीहरी माझ्या बरोबर असणार याची मात्र खात्री आहे..अशा वेळी मला त्याला म्हणावेसे वाटते...

       यापुढे जे दुःख मिळेल

       ते सगळे कर्म माझे

       आणि जे सुख मिळेल

       ते अगम्य प्रेम तुझे..????

सौ.माधुरी म.इनामदार...


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week