मराठी युवकांनी व्यवसायाचे धडे गिरवले पाहिजे !

मराठी युवकांनी व्यवसायाचे धडे गिरवले पाहिजे !

     (लेख - संदीप गायकवाड) मी काही असा खूप मोठा तत्वज्ञानी आहे किंवा व्याख्याता आहे, अशातला हा विषय नाही. माझा जो अनुभव आहे किंवा मी जे काही समजू शकलो आहे व्यवसायाच्या विषयी तेच परखडपणे मी आपल्याला शब्दबद्ध करून सांगतो आहे. वेळ हा कुणासाठी आजपर्यंत कधीच थांबला नाही व थांबणार सुद्धा नाही पण हे तेवढच सत्य आहे आपल्याला मात्र वेळेच्या सोबतच चालायचं आहे, त्याच्याशी घट्ट मैत्री करून स्वतःचा आणि समाजाचा, देशाचा विकास घडवायचा आहे. म्हणून आज मराठी तरुणांनी व्यवसाय विषयी जागृत होण्याची नितांत गरज आहे. कारण व्यवसाय करू तरच आपण आपलं अस्तित्व चिरकालीन ठेऊ शकतो एक चांगला समाज देऊ शकतो आणि ती ऊर्जा व्यवसायामध्ये आहे आणि ती ऊर्जा जर मिळाली तर नक्कीच आपण त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही. 

        मराठी तरुणांनी आज व्यवसायामध्ये येण्याची गरज आहे, कारण जी  मुंबई भारतासारख्या बलाढ्य देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रतिनिधित्व करते जगामध्ये मिरवते त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या मुंबई मध्ये आज मराठी तरुण व्यवसायात कुठे आहे परराज्यातील युवक येथे येऊन व्यवसाय करतात बस्तान इथंच मांडतात आपल्या सारखी छानपैकी मराठी भाषा बोलतात, मात्र आमचा मराठी तरुण काय करतो त्यांचीच चाकोरी करतो आहे म्हणजे काय आपणच आपल्या स्वतःच्या घरात एक नोकर म्हणून वागतो आहे.हि अवस्था बदलली पाहिजे. मराठी तरुणांनी आता चाकर नाही तर मालक म्हणून रुबाबात मुंबई महाराष्ट्रात वावरलं पाहिजे पण हे शक्य केंव्हा होईल जेंव्हा आमचा मराठी तरुण हा व्यवसायाकडे एक चांगल्या दृष्टिकोणाने बघेल तो त्याचं करिअर म्हणून व्यवसायाला स्वीकारेल.

      पण एक हातानी टाळी कधीच वाजत नाही कारण मुंबई महाराष्ट्रा मधला तरुण जर व्यवसायाने समृद्ध होऊ पाहत असेल तर त्याला राज्य शासनाने पण हात देणे गरजेचे आहे. शासनांनी वेगवेग्ळ्या सोप्या आणि सरळ ऋण योजना युवकांसाठी अंमलात आणल्या पाहिजेत किंवा आणल्या पण असतील पण त्याचा फायदा कितपत मराठी तरुणांना झाला जेणे करून मराठी युवक व्यवसायाच्या प्रवाहात चांगल्या प्रकारे समृद्ध झाला किंवा समृद्ध होऊ पाहत आहे. व्यवसाय करणे म्हणजे त्याला हत्तीचा बळ मिळालं असं जरी म्हणाला गेलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण व्यवसाय मध्ये ताकद आहे ती एका चाकरी मध्ये नाही. तुमचा छोटा जरी व्यवसाय असेल तरी तो तुम्हाला त्या उंच शिखराच्या माथ्यावर नक्कीच घेऊन जाईल जर प्रामाणिक प्रयत्न केले तर.

       आज सगळीकडे विशेष मुंबई महाराष्ट्र मध्ये परंपरांतीय तरुण आपल्याला जास्तीत जास्त व्यवसायामध्ये दिसून येतो, मग त्यांना ते जमत ते इथल्या मराठी तरुणांना जमू शकणार नाही अस मुळीच नाही फक्त गडबड काय होते मराठी तरुण हा चाकरीच्या मागे लागतो आणि परप्रांतीय तरुण हा मालकीच्या मागे लागतो हाच एक दुवा आहे म्हणून मराठी तरुणाने चाकरी सोडून मालकीच्या मागे लागलं पाहिजे तेंव्हाच मराठी तरुण व्यवसायामध्ये समृद्ध होईल.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week