तत्कालीन प्रस्थापित समाज व राजसत्ता !

तत्कालीन प्रस्थापित समाज व राजसत्ता !

ज्याच्या ह्रदयात आपल्या समाजाच्या, संघटनेच्या, मित्र-परिवाराच्या, कुटुंबाच्या विकासाची आंतरिक तळमळ असते, इतरांचे दुःख बघून ज्याची आतडी पिळवटून निघतात, जे आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असतात, जे निःस्वार्थ असतात, जे स्वतःशी व ईश्वराशी प्रामाणिक असतात, ज्यांना समाजापासून वेगळे पडल्यावर स्वतःला भोगाव्या लागणाऱ्या दुःखद संकटांची तमा नसते ते  आपले सर्वस्व पणाला लावून जनकल्याणासाठी अहोरात्र झटत असतात... असे नसते तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, राजा राम मोहनराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, पूज्य साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत शिरोमणी तुकाराम असे असंख्य महापुरुष या धरतीवर जन्माला आले नसते. या सर्वांनीच तत्कालीन प्रस्थापित समाज व राजसत्तेचा तीव्र रोष पत्करून समाजोन्नतीसाठी प्रखर लढा दिला.  राजा राम मोहनराय नसते तर आजही म्रुत पतीच्या सरणावर जळणाऱ्या विधवा स्त्रियांच्या जीवघेण्या किंकाळ्या कानावर आदळल्या असत्या. महात्मा फुले नसते तर आजही स्त्रिया अज्ञान आणि गुलामीच्या अंधारात खितपत पडलेल्या दिसल्या असत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजही दलित समाज दारिद्र्य, अज्ञान आणि उच्च वर्णियांच्या गुलामीच्या जंजिरांनी जखडलेला असता, छत्रपती शाहू महाराज नसते तर सवर्णांना प्रथम  "आरक्षण" देणारी ही संकल्पनाच जन्माला आली नसती, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज हिंदू धर्मही अस्तित्वात असलेला दिसला नसता......

                                अशोक सावंत (लोअरपरेल - मुंबई)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week