
गुढीपाडवा, रामनवमी व इतर घटनांचे अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनव्ये पोलीस उपआयुक्तलयाचे आदेश जारी !!
गुढीपाडवा, रामनवमी व इतर घटनांचे अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनव्ये पोलीस उपआयुक्तलयाचे आदेश जारी !!
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या कडुन जनतेच्या विविध मागण्यांसाठी, मोर्चे आंदोलने, घेराव, धरणे, सभा, अतिक्रमण हटवणे तसेच दिनांक २ एप्रिल रोजी गुढीपाडवा, दिनांक १० एप्रिल २२ रोजी या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस ठाणे कार्य क्षेत्रामध्ये शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिकांचे वित्त व जीवित सुरक्षित राहण्यासाठी तसेच समाज कंटक गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्या वर प्रतिबंधक कारवाई करणे सोयीचे व्हावे या करिता श्री विजय कान्त सागर यांनी मनाई आदेश लागू करून खालील बाबतीत प्रतिबंध केला आहे.
शस्त्रे, सोटे, भाले, बंदुका, लाठ्या, किंवा शरीरात इजा करण्यासाठी वापरण्यात येणारे अशी कोणतीही वस्तू वापरणे,
दगड किंवा क्षेपणास्त्रे फेकवयाची साधने गोळा करणे,
कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
व्यक्तीच्या प्रेताकृती प्रतिमेचे प्रदर्शन करणे,
सार्वजनिक रितेने घोषणा करणे गाणे गाणे वाद्य वाजवणे.
सभ्यता नीती विरुद्ध असणे किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा त्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे,
पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे जाहीर सभा घेणे मिरवणुका काढणे, घोषणा देणे, प्रति घोषणा देणे इ गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.
सदरातील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
जो कोणी इसम दिवस सरकारी नोकर आहे, ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्र घेणं भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे.
सदर आदेश खालील बाबींवर लागू होणार नाहीत.
लग्न कार्यासाठी जमलेले लोक,
प्रेत यात्रा, अंत्य संस्कारासाठी काढण्यात आलेली मिरवणूक.
सरकारी निमसरकारी कोर्ट या ठिकाणी जमलेले लोक.
सरकारी संस्था व शैक्षणिक संस्था येथे जमलेले लोक
पोलीस अधिकाऱ्याने परवानगी दिलेल्या मिरवणुका इ.
वरील मनाई आदेश दिनांक २९ मार्च ०२२ पासून ते १२ एप्रिल ०२२ पर्यंत लागू राहतील, नियम भंग करणाऱ्यांवर महाराष्ट्र अधिनियम कायदा कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यांत येईल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.