नायगाव-भाईंदर खाडी पुलाच्या कामाबरोबर मेट्रोचा समावेश करण्याची मागणी !!

नायगाव-भाईंदर खाडी पुलाच्या कामाबरोबर मेट्रोचा समावेश करण्याची मागणी !!

  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत, विस्तारीत मुंबई नागरी पायभूत प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक सुधारण्याकरीता वसई-भाईंदर पुलावरील काम घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरात वसई-भाईंदर क्षेत्रातुन रोज लाखो नागरिक कामा निमित्ताने ये-जा करीत असतात. सदर प्रवास करताना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नायगाव भाईंदर खाडीवर प्रस्तावित पुलाच्या कामात भाईंदर ते वसई मेट्रोचा समावेश केल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येसोबत राष्ट्रीयमहामार्ग ८ वरील वाहतुकीचा त्रास कमी होण्यास मदत होणार असुन नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

        त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष प्रवासासाठी बोटीवर अवलंबून राहणाऱ्या पाणजु बेटा वरील नागरिकांचा प्रवास देखील या पुलामुळे सुखकर होण्यास मदत होणार असल्याने याचा तातडीने विचार करण्याची मागणी वसईचे आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.

      वसई विरार ला जाण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हे दोन मार्ग उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वे वरील लोकल मध्ये जीवघेणी गर्दी होत असते. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून नायगाव आणि भाईंदर च्या मध्ये असलेल्या खाडीवर पूल उभारल्यास वसई विरार भाईंदर मधील अंतर कमी होऊन वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. सध्यस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मुंबई पश्चिम उपनगर ते भाईंदर पश्चिम दरम्यान मेट्रो काम देण्यात आले असून सदर मेट्रोचे कारशेड हे भाईंदर लगत  कडील प्रस्तापिता पोहचमार्ग आहे या सर्व बाबींचा विचार करता सदर बांधकामामध्ये  भाईंदर ते वसई मेट्रो महामार्गाचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना प्रवासात होणारा त्रास वाचण्यास मदत होईल. सदर पुलाच्या बांधकामा साठी २००७ आणि २०१५ मध्ये निधी मंजूर झालेला असून आजमितीस कामाला सुरुवात झालेली नाही. तरी सदर पुलाच्या कामाला प्राधान्य देऊन त्या कामामध्ये भाईंदर ते वसई मेट्रो कामाचा समावेश करण्याची मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी एमएमआरडीए च्या आयुक्तांकडे केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week