
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाडे सवलत मिळावयास हवी !!
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाडे सवलत मिळावयास हवी !!
ज्येष्ठ नागरिक ११ प्रकारचे आजार, खेळाडू, विशेष विध्यार्थी अशाना रेल्वे प्रवासाकरीता ५०% सवलत मिळत होती. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्यामुळे या पुढे ही सवलत रद्द करण्यात येत आहे. असे रेल्वे मंत्र्याने जाहीर केले आहे. या सवलतींमुळे सरकारवर १५०० कोटीहून अधिक चा भार पडत होता असे सांगण्यात येत असले तरी, माहितीच्या अधिकारात अब्जाधीश ५० कर्ज बुडव्यांचे ६८ हजार कोटी रु सरकारने काही तांत्रिक करणे देऊन माफ केले आहेत. अनेकजण बँकांना बुडवून फरार झाले आहेत. त्याचप्रमाणे निवृत्त होणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रवास सवलत चालूच आहे. तरी सन २०१३ रोजीच्या निवडणूक पूर्वी अच्छे दिन येण्याची घोषणा करून बीजेपी सरकार स्थापन झाले आहे. त्याला आज ८ वर्षे झाली. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे सरकार ८ वर्षाच्या कालावधीत अब्जावधींचे कर्ज बुडविणाऱ्यांकडून संपत्ती जप्त करू शकत नाही आहेत. आणि आता ज्येष्ठ नागरीकांकडून रेल्वेची ५०% सवलत रद्द करीत आहेत. हे दुर्दैव असून, या पुढील निवडणुकांमध्ये कोणत्याही आश्वासनांना बळी न पडता कोणाला मत द्यायचे ह्याचा विचार मतदार नक्कीच करतील.