सारवा सारव, उशीरा सुचलेले शहाणपण !!

सारवा सारव, उशीरा सुचलेले शहाणपण !!

       राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी महाराष्ट्रातील इतर भाषिकांचे मुंबईला आर्थिक राजधानी बनविण्यात महत्त्वाचे कार्य असल्याचे भाष्य करून, गुजराती आणि राजस्थानी समाजाशिवाय आर्थिक भविष्य नाही. अशा प्रकारे जीभ घसरत, बेताल वक्तव्य केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ सर्वत्र राज्यपाल विरोधी संताप, राजीन्यामाची मागणी, मराठी माणसांची माफी मागावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली असून, आता राज्यपालांनी सारवासार्वीची भाषा केली असून, मराठी माणसांना कमी लेखण्याचा कुठलाही हेतू नव्हता. मराठी माणसांनी कष्ट करून महाराष्ट्र, मुंबई उभी केली आहे. अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. जगभरात मराठीचा झेंडा रोवत आहे. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा माझा उल्लेख नव्हता. इ स्पष्टीकरण देत आहेत. अशा प्रकारे उशीरा सुचलेल्या शहाणपणाची राज्यपाल सारवा सारव करीत आहेत.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week