
जयंतीच्या मिरवणुकीत झेंड्यानेच घेतला प्राण !
डॉ बाबासाहेब जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघ जागीच ठार, पाच गंभीर जखमी !
१४ एप्रिल बाबासाहेब यांची १३२ वी जयंती देशभरात उत्साहाने साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सर्वत्र आंबेडकर अनुयायी हे गाजावाजासाहित मिरवणुका काढतात. जयंतीच्या उत्साहाला उधाण आलेलं असत. अशाच एका मिरवणुकीत अचानक शोककळा पसरली.
दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी विरार तालुका पालघर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघे जागीच ठार झाले. तर पाच गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की विरार पुर्व मनवेल पाडा येथे असलेल्या कारगिल नगर येथील बौद्धजन समितीने, जयंती निमित्त आंबेडकर अनुयायांनी काढलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोन अनुयायी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले,
बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी याचे कडून माहिती प्राप्त झाली की, दिनांक १४ एप्रिल ०२३ रोजी जयंती निमित्त कारगिल नगर येथील बुधजन समिती शाखा यांची मिरवणूक साधारण रात्री ९ वाजता सुरू झाली. आणि दहा नंतर कारगिल चौकात आली. पोलीस बंदोबस्तात होते साधारण साडेदहा च्या सुमारास निवडणूक कारगिल चौकात येऊन थांबली. मिरवणुकीतील जोडगाडी ३,४ जण ओढत होते, आणि तीन चार जण जोडगाडीच्या वर उभे होते. त्या जोडगाडीच्या वर स्टीलचा झेंडा लावलेला होता. दुर्दैवाने तो झेंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफार्मर लागला. आणि झेंड्यामध्ये करंट उतरला.
हा विजेचा धक्का इतका मोठा होता की, सुमित शिवाजी सूत, वय वर्ष २०, रुपेश सुरेश सुर्वे, वय वर्ष २८ हे दोघे जागीच मृत्यू झाला. तर राहुल जगताप, उमेश कनोजिया, अस्मित कांबळे, सत्यनारायण पंडित, रोहित गायकवाड हे जबर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्याच्या लगत असलेल्या CCTV मध्ये ही दुर्दैवी घटना कैद झाली आहे. ह्या घटनेमुळे वसई विरार परिसरात जयंतीच्या आनंदावर विरजण पडून शोककळा पसरली आहे.
अशा कोणत्याही प्रकारचे उत्सव साजरे करताना, मिरवणुका काढताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, जेणे करून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत.