
विरोधकांची एकवाक्यता हवी !!
२०१४ रोजी भाजपने २८ पक्षांची युती करून निवडणुका लढविल्या होत्या. त्यांच्या मागे आर एस एस ही बलाढ्य संघटना होती आणि आता देशभरातील १५ पक्ष एकत्र येऊन २०२४ ला भाजपला पराभूत करू इच्छित आहेत. यामध्ये कित्येक पक्ष हे प्रादेशिक आहेत हे मान्य करावयास हवे. आप चे नेते अटी घालून सामील होत असतील तर ऐक्य कसे होणार ? त्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार अनुभवी असले तरी, त्यांचे खासदार किती निवडून येणार ? कर्नाटक मध्ये काँग्रेस जिंकली म्हणजे देशात काँग्रेस बलाढ्य आहे का ? या एक जुटीचा परिणाम निश्चित होत असून, भाजप वर काही परिणाम होणार नाही, असे अवसान आणून म्हणत असले तरी, अच्छे दिनाचा फुसक्या आश्वासनाचा रोष जनतेच्या मनात आहे. तरीही सरकारकडे मिडिया आहे, ईडी आहे, सरकारी यंत्रणा आहे. याचा विरोधी पक्षाने विचार करावा. जनतेच्या विश्वासासाठी विरोधी पक्षांची एकवाक्यता ही निश्चित असावी आणि नंतर नेता निवडावा.