
शपत विधीला एवढी घाई का ?
महाराष्ट्राच्या साडेतीन वर्षात चौथा शपत विधी शिंदे, भाजप गटाच्या सत्तारूढ पक्षामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी तिसऱ्यांदा उप मुख्यमंत्री पदी शपत घेतली असली तरी स्वतःला स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणारे, शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही म्हणणारे, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबर महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार मध्ये काम करणार असे म्हणतात. तत्पूर्वी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यावे असे म्हटले होते. हसन मुश्रीफ यांना इडी चौकशी चालू आहे. त्यांना तुरुंगात पाठवायचे होते. त्यांना आता मंत्रिपद मिळालेले आहे. महाविकास आघाडी सत्ता स्थापनाच्या वेळी शिवाजी पार्क येथील सर्व जनतेच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती. आणि नुसते न्यायालयीन दिर्घ प्रक्रिया आणि आमदारांच्या संख्येच्या बळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित न करता राजभवन वर एवढे घाई मध्ये शपत घेण्याची गरज होती का ?