
पुणे शिरूर विभागात दलालांचा सुळसुळाट...
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तहसीलदार कार्यालयात एजेंट चा सुळसुळाट चालू आहे.
कामा निमित्त तेथे येणाऱा सामान्य माणूस व शेतकरी कशा प्रकारे भरडला जातोय हे तेथे गेल्यावर कळतं. सरकारने आव्हान केल्याप्रमाणे सरकारी कोणतीही कामं एक. दोन.तीन. दिवसात अजिबात होत नाही. सामान्य व शेतकरी बांधवांना ह्या लॉकडाऊन काळात किती खर्च येतो व किती धक्के खायला लागतात हे त्यालाच माहीत. साधं रेशनकार्ड बनवले तरी एक ते दोन हजार रुपये द्यावे लागते. उत्पन्न कमी करण्यासाठी सुध्दा एजेंट शिवाय काम होत नाही. तेथील परिस्थिती फार बिकट आहे. अगोदरच सामान्य माणूस व शेतकरी बांधव आयुष्याला कंटाळला आहे. तहसिलदार कार्यालय एक दोन फेरीत कधीच कामं होत नाही. एकतर लॉकडाऊन च्या काळात एसटी सेवा संपूर्ण कोळमंडली आहे. वेळेवर गावी जायला गाडी मिळतं नाही. प्राव्हेट गाडी घेऊन कधी कधी शेतकरी बांधवांना तालुक्याला यावे लागते.
सरकार व देव जाणे सामान्य माणसाचे आणि शेतकरी बांधवांचे हाल कधी थांबणार...