
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात अग्नीतांडव !
आज दि. २३ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ३.१५ च्या सुमारास विरार येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात एअर कंडिशनचा स्फोट होऊन रुग्णालयात भीषण आग लागली. अतिदक्षता विभागाला आग लागली त्या दरम्यान अति दक्षता विभागात कोणताही स्टाफ नव्हता अस डॉ शाह म्हणाले. रुग्णालयात एकूण ९० रुग्ण उपचार घेत होते त्यापैकी १७ रुग्ण अतिदक्षता विभागात होते. त्यापैकी एकूण १४ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांच्या वारसांशी बोलले असता, अत्यावश्यक सेवेमध्ये आग विझविण्याचं कोणतंही साधन रुग्णलयात नसल्याचे त्यांनी सांगितलं. रुग्णालयातील इतर रुग्ण वसई विरार येथील काही हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहेत. भीषण आग लागल्याची बातमी ऐकताच सर्व प्रथम वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर यानी घटना स्थळी प्रथम भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. तसेच पालकमंत्री भुसे, मंत्री जितेंद्र आव्हाड, यांनी घटनास्थळी भेट दिली. बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट दिली कोविडच्या उद्रेकामुळे नियंत्रणावर ताण आला अशा प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या व ह्याची चौकशी होईल असे सांगितले. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली व दहा दिवसांत चौकशीचा अवहाल सादर करू असे सांगितले, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महानिरीक्षकांना विरार च्या घटने संबंधित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरार येथील घटना अत्यन्त दुर्दैवी आहे व या घटनेची ताबडतोब चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये व गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर केलीआहे. पंतप्रधान मोदीजी नी रुग्णांच्या वारसाला १ लाख रुपये व जखमी झालेल्या रुग्णांना ५०.००० हजार रुपयांची मदत जाहीर केली. वारंवार अश्या घटना घडणे चिंताजनक आहे.
राज्य सरकारला राज्यातील रुग्णालयाच ऑडिट करायला सांगितलं होतं, अशी तक्रार ही राज्य सरकारला दिली होती परंतु राज्य सरकारने दुर्लक्ष केले. असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिला.