
वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याचे बिऱ्हाडी आंदोलन ?
वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याचे बिऱ्हाडी आंदोलन ?
वसई तहसीलदार आणि प्रशासना विरुद्ध लाल बावट्याने आता कंबर कसली आहे. वसई तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन लाल बावट्याच्या वतीने सातत्याने प्रशासनाला निवेदन देण्यात आली होती. प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यासाठी मोर्चे, आंदोलने, धरणे इ. मार्गाने देखील झोपी गेलेल्या प्रशासनाला सतत जाग करण्याचा प्रयत्न लाल बावट्याने केला होता. परंतु प्रशासना तर्फे तेवढ्या पुरते कधी तोंडी, तर कधी लेखी आश्वासने देण्यात आली. परंतु सर्व समान्य गोरगरिबांचे प्रश्न प्रशासनाने काही सोडविले नाहीत. म्हणून १ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण व बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक लाल बावट्याने दिली होती. सोमवार पासून आंदोलन करणार म्हणून रविवारीच तहसील कार्यालय उघडावे लागले.
अखेर १० दिवसात आम्ही सर्व मागण्या मान्य करू आणि त्या पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलू असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच जातीच्या दाखल्याची सर्व प्रकरणे निकालात काढू असे आश्वासन वसईच्या तहसीलदार उज्वला भगत (बनसोडे) यांनी दिले.