
वसई विरार पाणीपुरवठ्याचे लेखा परीक्षण !
वसई विरार शहरातील पाणीटंचाई आणि त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल पालक मंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. शहराचे पाणीनियोजन आणि एकंदरीत पाणी समस्येचा आढावा घेण्यासाठी पाण्याचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वसई विरार शहराची लोकसख्यां २५ लाखाहून अधिक आहे. शहरासाठी रोज २३० दशलक्ष पाणी पुरवठा केला जातो. त्यातही १२० दश लक्ष पाणीपुरवठयाची तूट भेडसावत असते. सदोष वितरण व्यवस्था ठीक ठिकाणी होत असलेली पाण्याची गळती, पाणीचोरी, वारंवार जसळवाहिन्या फुटणे आदी समस्यांमुळे पाणीटंचाईत भर पडली आहे. तसेच काही ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा होतो. तर अनेक ठिकाणी ३ ते ४ दिवसानी पाणी येते. यामुळे शहराच्या संपूर्ण पाणी पुरवठा योजनेचे लेखा परीक्षण करावे अशी मागणी माजी शिवसेना स्थायी सभापती सुदेश चौधरी आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी पालक मंत्र्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषगाने पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा योजनेचे लेखा परीक्षण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पण यावर कधी अंमलबजावणी केली जाणार ? का फक्त आश्वासने ? असे प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.