
वसई माणिकपूर नाक्यावर सिग्नल नाही ! वसई तालुका वाहतूक प्रशासन इथे लक्ष देईल का ????
वसई माणिकपूर नाक्यावर सिग्नल नाही ! वसई तालुका वाहतूक प्रशासन इथे लक्ष देईल का ????
वसई तालुका वसई स्टेशन माणिकपपुर नाका महत्वाचा थांबा आणि मार्केट लेन आहे. चौक असल्यामुळे चौबाजूने वाहतुकीची ये जा चालू असते वसई स्टेशन पासून गावात जाणारा रस्ता आणि गावातून वसई स्टेशन ला येणारा रस्ता वन वे नसून एकच आहे. तसेच ह्या मुख्य रस्त्याला जोडलेले उमेळमान व दिवाणमान असे दोन गावात जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावर चारी बाजूने येणाऱ्या वाहनांची गर्दी लागलेली असते. आजू बाजूला शाळा असल्याने शाळकरी मुलांना रस्ता क्रॉस करणं जोखमीचे होऊन जाते, रोजच वाहतुकीची कोंडी होऊन रिक्षा चालक, खाजगी वाहने यांच्यात रस्ता क्रॉसिग करताना बाचाबाची होत असते. पेसेंजर भरलेल्या रिक्षा कधी, कधी उलटणण्याचा संभव असतो. आणि जास्त संध्याकाळच्या वेळेस रस्ता क्रॉस करण जिकरीचे आणि मुश्किल होऊन जाते !
शाळेतील मुले वेडी वाकडी धावत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण मुश्किल होऊन जातं. म्हातारी माणसे तर कितीतरी वेळ रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी असतात. अडचण असताना सुद्धा वाहतूक पोलीस नेहमी हजर नसतात. कधीतरी उभे राहिलेले दिसतात. दिवसा तर त्यांचा पत्ताच नसतो !
इतकी वाहतुकीची कोंडी होत असताना वाहतूक विभागाने तिथे पूर्ण दुर्लक्ष करून सिग्नलची गरज असताना सिग्नल लावलेला नाही. संतप्त क्रॉसिंग करणारे लोक प्रशासनाला शिव्या घालतात. तरी लवकरात लवकर माणिकपूर नाक्यावर सिग्नल लावावा अशी जनतेची मागणी आहे.