
खाद्य तेलाच्या बोगस धंद्याचा भांडा फोड !!
मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तीला चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच वायरल होत आहे. मंगळवारी अविनाश जाधव यांनी नालासोपारा फाटा उत्तम कंपाउंड येथे एका अनधिकृत गाळ्यात भेसळयुक्त खादय तेलाच्या कारखान्याचा भांडा फोड केला होता. या वेळी एकाच तेलातून पामतेल, रिफाईंड तेल, झिरो कोलेस्ट्रॉल असलेलं संनफ्लॉवर तेल ही बनवलं जात होतं. तेलाचे डबे खराब अवस्थेत होते. तेलाची टाकी ही खराब अवस्थेत होते. याबाबत तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला जाब विचारल्यावर त्याने समाधान कारक उत्तर न दिल्याने अविनाश जाधव यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली होती. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू मात्र प्रशासनाच यावर लक्षच नसल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी या वेळी केला होता.
नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ चालू आहे. नालासोपारा फाटा, उमरकंपाउंड येथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेले खाद्य तेल बनवल जातं याचा भांडा फोड मनसेनं केला.
वसई विरार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या गाळ्यावर धाड टाकली. त्यांनी खाद्य तेलाची कशाप्रकारे भेसळ चालू आहे. हे निदर्शनास आणून दिल. वसई विरार पालिका आणि अन्न आणि औषध प्रशासन यांची कोणतीही परवानगी न घेता खाद्य तेल बनवलं जात होतं.
एकाच तेलातुन पामतेल, रिफाईंड तेल आणि झिरो कोलेस्ट्रॉल असलेलं सनफ्लॉवर तेल ही बनवलं जात होतं. तेलाची टाकी खराब अवस्थेत होती मनसेनं याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळवून ही त्यांचा एकही अधिकारी कारवाईसाठी फिरकलाच नाही. या उमर कंपाउंड आणि आजूबाजुला असे भेसळ खाद्य तेल बनविणारे १५ ते १६ कारखाने आहेत. मात्र अश्या कारखान्यावर ना अन्न व औषध प्रशासन ना पालिका प्रशासनाची नजर जात आहे.
हे खाद्य तेल वसई विरार आणि आजूबाजूच्या परिसरात वेफर्स आणि फरसाण बनविण्यासाठी वापरलं जातं होत. अश्या खाद्य तेलामुळे नागरिकाच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असा आरोप जाधव यांनी केला.