
वाहतूक नियमांच्या दंडात वाढ, नवीन नियमानुसार भरावा लागणार वाहतूक दंड !!
वाहतूक नियमांच्या दंडात वाढ, नवीन नियमानुसार भरावा लागणार वाहतूक दंड !!
आजकाल दुचाकी चारचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणात सर्रास वापर होत चालला आहे. फायनान्स कंपन्या आपला बाजार वाढवण्यासाठी कमी हप्यावर नागरिकांना गाड्या घेण्यासाठी लोन देत आहेत. मुल, मुली अगदी नववी दहावीत गेल्यावर ही त्यांना ये जा करण्यासाठी पालक वाहन खरीदी करून देतात. वाहन चालकांचा परवाना (लायसंस) जवळ नसताना तसेच वाहतूक नियमांची काही माहिती नसताना, तरुण वर्ग सर्रास गाड्या घेऊन फिरताना दिसतात. कधी कधी अपघात ही घडत असतात. वाहतूक नियमांची अंमल बजावणी न करता लहानां बरोबर मोठी माणसं वाहन चालवत असतात. असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व इतर वाहन चालविणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ ची अंमल बजावणी करण्याचे नियम आदेश जारी केले आहेत.
अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी वाहतुकीच्या नवीन नियम कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास, 'इ' चलानद्वारे दंड आकारण्या बाबत अधी सूचना जारी केल्या आहेत.
नवीन सुधारित वाहतूक नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध दंडाच्या रक्कमेत वाढ झालेली असून दिनांक ११/१२/२०२१ रोजी मध्य रात्री पासून 'इ' चलन मशीनमध्ये अद्यावत करण्यात आले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला आता नवीन नियमानुसार दंड भरावा लागणार आहे.
राज्य शासनाने मोटार वाहन कायदयात दंडाच्या वाढीची अधी सूचना जारी केल्याने दिनांक १२/१२/२०२१ पासून मीरा-भायंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलिसांच्या' ' इ' चलन मशीन मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मिरा-भायंदार, वसई-विरार, शहरामध्ये देखील मोटार वाहन कायद्यांमध्ये नवीन वाढ झालेली दंडाची रक्कम रविवार पासून वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना भरावी लागणार आहे.
वाहतूक नियमांच्या सर्वच कलमांच्या दंडामध्ये (रक्कमेत) वाढ करण्यात आली आहे. तसेच काही कलमामध्ये लायसन्स निलंबन व इतर अटी शर्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
याबाबत सर्व नागरिकांनी सजग राहावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडून करण्यात आले आहे.