
गोळीबार करून हत्या करणारे सराईत आरोपितांना उत्तरप्रदेश येथे ठोकल्या बेड्या !!
गोळीबार करून हत्या करणारे सराईत आरोपितांना उत्तरप्रदेश येथे ठोकल्या बेड्या !!
गोळीबार करून हत्या करणारे सराईत आरोपितांना उत्तर प्रदेश मध्ये अटक !!
दिनांक २६ मार्च ०२२ रोजी विरार पोलीस ठाणे हद्दी मध्ये सवा एक च्या सुमारास श्री कृष्ण फर्निचर वरील रोडवर, भाजीपाला मार्केट च्या बाहेरील ९० फिट रोड मनवेल पाडा, विरार पूर्व ता. वसई येथे समरजित, उर्फ समय विक्रमसिह चौहान रा रूम नंबर ए २०१ अग्रवाल कॉम्प्लेक्स गोकुळ हाईट्स च्या बाजूला, डी मार्ट समोर विरार पश्चिम, ता वसई जिल्हा पालघर हा त्याच्या ऑफिस मधून गाडी कडे जात असताना, दोन अनोळखी इसमानी त्यांच्या जवळ असलेल्या अग्निशास्त्राने त्यांच्या डोक्यावर गोळी बार करून दिवसा ढवळ्या त्याचा निर्घृण खून केला होता. ह्या खुना बाबत विरार पोलीस ठाण्यात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरच्या गोळी बाराच्या घटनेने वसई विरार परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा १,२,३, मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच विरार पोलीस ठाणे मार्फत वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या.
सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी तांत्रिक बाबींचे विश्लेषण करण्यात आले, तसेच गोपनीय बातमीदारकडून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या तांत्रिक बाबींच्या माहिती वरून आरोपीतांची ओळख पटविण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांना यश आले.
त्या अनुषंगाने मुंबई, ठाणे, वसई, विरार, मिरारोड या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडुन सदर आरोपितांची माहिती प्राप्त करण्यात आली. विश्वसनीय बातमीदाराकडून आरोपी हा उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची खात्री लायक बातमी मिळाल्याने मा डॉ महेश पाटील उप आयुक्त गुन्हे हे स्वतः सोबत पो निरीक्षक प्रमोद बढाख, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ व पथक हे उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी एस. टी. एफ. उत्तर प्रदेश यांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच वाराणसी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सोबत समन्वय साधून संयुक्तरित्या आरोपिताचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली असता स्थानिक गोपनिय बातमीदाराद्वारे बातमी मिळवून दिनांक २९ मार्च ०२२ रोजी सकाळी चिताईपूर चौक, भिकारीपूर रोड, वाराणशी उत्तर प्रदेश येथून कुविख्यात आरोपी पहिला आरोपी राहुल विरेंद्र शर्मा, उर्फ राम, रा बरवान, पोस्ट कटौना, तालुका पिंडरा, जि.वाराणशी, राज्य उत्तरप्रदेश. दुसरा आरोपी अभिषेक तारकेश्वर सिंह उर्फ अंकुर रा. लोहारडिह, पोस्ट कपसेठी ता पिंडरा, जि वाराणशी राज्य उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले असून विचारपूस केली असता त्यानी सदर गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यामध्ये त्यांच्या सोबत मनीष सिह उर्फ सोनू तसेच आणखी एक आरोपी असल्याची माहिती दिली.
गुन्ह्यातील अटक आरोपी राहुल विरेंद्र शर्मा उर्फ राम याने सन २०१३ माफ़, 5 निर्मल नगर पोलीस ठाणे मुंबई येथे विजय पुजारी उर्फ बट्टा याची गोळी मारून हत्या केली होती. त्याच्यावरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्याच प्रमाणे २०१३ अजील शेख याची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. तसेच २०१५ मध्ये मिरारोड पुष्पक हॉटेल समोर बंटी प्रधान याची गोळी मारून हत्या केली होती. या खुना संदर्भात मिरारोड पो ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्यामधला आरोपी राहुल विरेंद्र शर्मा उर्फ हा मागील ९ वर्षी पासून फरारी आहे.
वरील आरोपी यांचे अटकेची कारवाई ही एस.टी.एफ. वाराणशी व गुन्हे शाखा मिराभाईंदर, वसई विरार यांनी संयुक्त रित्या केली.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री एस जयकुमार, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री महेश पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ प्रशांत वाघूंडे, सहा पो आयुक्त अमोल मांडवे, सहा आयुक्त श्री रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक वराडे, पोलीस निरीक्षक दिलीप राख, विरार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बढाख, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, विरार पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस निरीक्षक शाहूंराज रणवरे, राहुल राख, पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर, सहा पोलीस निरीक्षक रंजितसिह परदेशी, सरक, सुर्वे, सोनवणे, भगत, बेंद्रे, बुराडे, पोलीस उप निरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस उप निरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलीस उप निरीक्षक संदेश राणे, पोलीस उप निरीक्षक अभिजित टेलर तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.