
हवस के पुजारी...
११ वर्षाच्या बलिकेचे अपहरण करून लैगिक अत्याचार करणाऱ्या नराधमस १२ तासाच्या आत अटक !
हल्ली अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखादया व्हर्जिन मुलीच कौमार्य भंग करण्याची मनोविकृत मानसिकता, बुरसटलेले विचार आणि त्या मानसिकतेत केलेली बलात्काराची कृती अतिशय घृणास्पद आहे. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर लैगिक अत्याचार करणं, कधी तिला जीवे ठार मारून टाकणं, असल्या घटना सर्रास घडत असतात. असल्या सर्व घटनांचा आढावा घेतला तर काळजीच सावट सर्व मुलींच्या आई वडिलांवर पसरते. जो पर्यंत मुलगी शाळेतून घरी येत नाही तो पर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो हे त्रिकाल सत्य आहे. आणि मग जर मुली सुरक्षितच नाहीत तर मग पैदा का कराव्या ? कदाचित भ्रूणहत्येच हे ही एक पुसट कारण असू शकेल.
परंतु अजूनही भारताच्या कायद्या मध्ये बलात्कार, लैंगिक अत्याचार विरोधात गंभीर कायदा नाही. फार फार काही महिने सजा, अथवा जन्मठेप आणि एखाद्या बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनात आरोपीला मागणी करून दयायला लावलेली फ़ाशी. परंतु त्यासाठी सुद्धा ठाम कायदा नाही यामुळे असले गुन्हे वारंवार घडत असतात, मग असल्या नराधमाना एकच शिक्षा व्हावी की स्त्रियांवर लैगिक अत्याचार करणाऱ्या पुरुषांचे लिंग छाटून त्यांना नपुंसक बनवावा ! आणि जीवनभराच्या प्राणांकीत यातना द्याव्या. त्यांनी केलेल्या नीच कृत्याचा जिंदगीभर त्यांना पश्चाताप होत राहावा, म्हणजे कुठला पुरूष पुन्हा असले अत्याचार करण्यास धजणार नाही. अशीच एक अल्पवयीन बालिका एका "हवस के पुजारी" असलेल्या नराधमाच्या लैंगिक अत्याचारास बळी पडली. ही घटना वसई येथे घडली.
दिनांक १५ मे ०२२ रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी वसई पोलीस ठाणे येथे येऊन फिर्याद दिली की त्यांची ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खेळायला जाते असे सांगून घरातून निघून गेली. खूप उशीर झाला तरी ती घरी परत आली नाही, त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून घेऊन तर गेले नाही ना या भीती पोटी मुलीच्या कुटुंबीयांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर मुलीचा शोध घेतला असता अपहरण झालेली मुलगी दिनांक १५ मे ०२२ रोजी, रात्री साडेतीन च्या सुमारास सापडली. महिला अंमलदार यांनी विश्वासात घेऊन तिला विचारले असता, असे समजले की एका अनोळखी इसमाने तिचे वसई स्टेशन येथून अपहरण करून एका ठिकाणी घेऊन जाऊन तिचे सोबत लैगिक अत्याचार केल्या बाबत माहिती मिळाली.
सदरच्या घटने बाबत वसई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळविले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ चार पथके नेमण्यात आली पीडित मुलीने सांगितल्या प्रमाणे वसई पोलिस ठाण्याच्या गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी आरिफ अय्युब शेख याला १२ तासाच्या आत अटक केली.
बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा भारतीय दंड विधान कलम ३६३ आणि ३७६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२, सह्ययक पोलीस आयुक्त श्री. प्रदीप गिरीधर वसई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कल्याणराव कर्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई पोलीस ठाणे, श्री. ऋषीकेश पवळ पोलीस निरीक्षक गुन्हे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राम सुरवसे, पो उप.नि. विष्णू वाघमोडे, महिला पोलीस उप निरीक्षक वृषाली थिटे, पोलीस हवालदार सुनील मलावकर, पोलीस अंमलदार बाळू गर्जे, अमोल पाटील भालेराव यांनी यशस्वी केली.
कोटींंनी लोकसंख्या असलेल्या ह्या भारत देशात असे कितीतरी बलात्काराचे गुन्हे कानाकोपऱ्यात रोज घडत असतील. काही गुन्ह्याचा छडा लागतो तर कधी कुटूंबीय इज्जत अब्रूच्या भीती पोटी लैगिक अत्याचार झालेले गुन्हे लपवतात. असल्या अत्याचाराचा अंत होणे कठीणच व्यक्ती तितक्या प्रकृती, मग महिलांच्या सुरक्षेचं काय? हा प्रश्न भेडसावतो. आपण सुरक्षिततेसाठी किती कुणाच्या भरवश्यावर राहणार ! कुणी येईल मला वाचवेल का अपेक्षा ? म्हणून आमच्या बातमीकार वृत्तपत्राद्वारे आमच्या वाचकांना इतरांना, एकच सांगणं आहे, तुम्ही आपल्या मुलींना उच्चशिक्षण देता. त्याच प्रमाणे तुम्ही आपल्या मुलीला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट (कराटे) च प्राशिक्षण द्या ! मी स्वतः मार्शलआर्ट (कराटे) ची २ डान ब्लॅक बेल्ट आहे. समोरच्या व्यक्तीशी चार हात करून स्वतःचे संरक्षण करू शकते. त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्या मुलींना उच्चशिक्षणा सोबत स्वरक्षणासाठी ही प्रशिक्षण द्यावे. त्या जोगे तुमची मुलगी असल्या अत्याचारास बळी पडणार नाही व सुरक्षित राहील.
वसईत अशी काही निर्जन ठिकाण आहेत जशी वसईचा किल्ला, पाचू बंदर, सुरुची बाग सर्व समुद्र किनारे, बेंनापट्टी, अर्नाळा बीच, अहमदाबाद हायवे कामण ते पेल्हार अशी ठिकाणे आहेत जिथे असल्या घृणास्पद घटना खूप घडत असतात. आणी ह्या घटनांचे प्रमाण वसई विरार येथे जास्त आहे. माननीय आयुक्त हे खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
परंतु अश्या निर्जन ठिकाणी सुरक्षितता कमी आहे. अश्या ठिकाणांना ठराविक वेळ नंतर निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित करावे किंवा प्रशासनाने गस्त वाढवावी, अगर पोलीस मनुष्यबळ कमी असेल तर वसईत अशा कितीतरी शोषल वर्क करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना गस्त घालण्यासाठी अधिकार द्यावेत, त्याजोगे अशा घटना घडणार नाहीत, ह्या सुचनेची माननीय आयुक्तांनी नोंद घ्यावी ही विनंती !
भारतात कितीतरी चॅरिटेबल ट्रस्ट आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्रात ही खूप संघटना स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहेत. मग अशा संघटना व पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था यांनी संयुक्त रित्या मुलींच्या संरक्षणासाठी मार्शल आर्ट (कराटे) च खास मुलींसाठी मोफत प्रशिक्षण सुरू केलं तर मुली स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ होतील व बहुतांशी असल्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
(क्राईम रिपोर्टर :- सौ. प्रीती तिवारी)