
ये छोटे ! चल तुमको बाईक पे घुमाके लाते है, नया मोबाईल भी दिलवाते है !!
ये छोटे ! चल तुमको बाईक पे घुमाके लाते है, नया मोबाईल भी दिलवाते है !!
दोन वर्षाच्या करोनाच्या महामारी मुळे खूप काम धंद्यांचं नुकसान झालं उद्योग बंद पडले, बेकारी वाढली आणि कितीतरी क्रिमिनल ही बनले. कोणत्याही गोष्टीची जास्त हाव ही हानीकारक असते त्यात पैशाची हाव ही तर मनुष्याला नीच पातळी पर्यंत घेऊन जाऊन वाईट कृत्य करण्यास भाग पाडते. माणसं विविध प्रकारे नीच पातळी गाठून लांच्छनास्पद गुन्हे करतात. स्वतःच्या हौशी मौजी पुरवण्यासाठी, कमी वेळात अंग मेहनत न करता लवकर श्रीमंत होणे, हवा तो बिजनेस करण्यासाठी गुन्हे करतात, परंतु वाईट गोष्टीचा परिणाम हा नेहमी वाईटच होत असतो. अशाच इझी मनीच्या हव्यासापोटी मीरारोड येथे एका बालकाचा जीव घेण्याची घृणास्पद घटना घडली.
अफजल मोहमद हनिफ अन्सारी वय २२ वर्ष राहणार सध्या फिरस्ता तन्ना खान यांच्या घरीं रूम नंबर ३०४, पूनम सागर, कब्रस्तान च्या बाजूला २) इम्रान नूरहासन शेख, वय २५ वर्ष कुरेशी चाळ रुम नो.११९, मुन्शी कंपाउंड मीरारोड पूर्व हे दोघे मित्र नवीन अंगात काहीतरी करण्याची उमेद मनात, पण.. पैसा नाही, मनात खूप चांगली स्वप्न उराशी बाळगलेली अफजल ला स्वतःच सलून टाकायचं होत आणि इम्रानला स्वतःच गैरेज टाकायचं होत. पण रस्ता मात्र चुकीचा निवडला, इतका पैसा लगेच आणायचा कुठून मग तो कमविण्यासाठी खंडणी वसूल करायची ठरलं, पण खंडणीच स्वरूप काय तर पिक्चर मधला क्लायमेट डोक्यात घुसला "नाबालिक बच्चे को अगवा करके फिरोती मागेंगे" !
मास्टर प्लॅन ४ ५ महिन्यापासून डोक्यात घोळू लागला, ठरलं ! दोघांचही संगनमत झालं. शांती पार्क गार्डन मध्ये खेळायला येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांवर नजर ठेवायला अफजल व इम्रानने सुरवात केली. आणि एका १३ वर्षाच्या बालकाला हेरले. हल्ली लहान मुलंही आईवडिलांनी शिकवून ठेवल्या प्रमाणे शहाणी झालेली आहेत. अनोळखी माणसांपासून सावध राहायचं मग मुलगा कसा हातात येणार म्हणून दोघांनी एका बालका बरोबर दोस्ती केली. शेवटी लहानच मुलं दोस्तीत फसतात, अजाण बालक शेवटी मित्राच्या भूल थापांना बळी पडला. अंश (खोटं नाव घेतलेलं) अंशची आई हिना नहार नारो सिंग वय वर्ष २७ राहणार रूम नो बी/४०७ कस्टर १, निअर बालाजी हॉटेल शांती पार्क नवऱ्यापासून फारकत घेतलेली बार मध्ये काम करणारी आपल्या भावासोबत राहत होती. अंश एकुलता एक लाडका मुलगा त्याच्या जवळ रोज हजार पाचशे रुपये खाऊला देऊन जायची. इतक्या लहान मुला जवळ रोज इतके पैसे पाहून, त्याच्या आईजवळ खूप पैसा असेल ! हा विचार करून दोघानी अंशला किडण्याप करण्याचं ठरवले. दिनांक ३१/७/०२२ रोजी रात्री साधारण दहाच्या सुमारास शांती पार्क मिररोड पूर्व परिसरातुन तुला फिरवून आणतो व तुला नवीन मोबाईल घेऊन देतो अस अंशला सांगून अफजल व इम्रान दोघांनी त्याला बाईक वर बसवले व अहमदाबाद हायवे वरून वसई च्या दिशेने निघाले. रात्रीची वेळ, कोण लक्ष देत कोण कुठं चाललंय आणि विचारलं तरी ओळखीचे आहेत असं सांगणे त्यामुळे काही त्यांना अडचण आली नाही. मुंबई अहमदाबाद हायवे, हॉटेल रॉयल गार्डन पासून पुढे, जैन मंदिराच्या पुढे, मालजी पाडा, ता. वसई, जिल्हा पालघर गावच्या हद्दीत असलेल्या वासाड्या पुलाजवळ येऊन अपहरण करून आणलेल्या अंशला पुलावरून खाली फेकून दिले. परंतु अंशच्या पायला दुखापत झाली, तो उठून लंगडत वर येऊ लागला दोघांनी पाहिले पूर्ण खुनाच्या तयारीनिशी आलेल्या दोघा नराधमांनी त्या इवल्याश्या असाह्य जीवाची पर्वा न करता क्रूर पणे त्याच्या पोटात चाकू खुपसून आईच्या काळजाच्या तुकड्यास जीवे ठार मारले. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पुन्हा त्याला पुलाखाली फेकून दिले.
दुसऱ्या दिवशी अंशच्या आई कडे ३५,००,०००/- रुपयांची खंडणी मागितली. अंश ची आई हिना हिने आपल्या मुलाच्या आवाज ऐकवा अस सांगितलं पण त्यानी नकार दिला, दिनांक ३१ जुलै रोजी २२ वाजताच्या सुमारास मुलगा घरी परतला नाही म्हणून काळजी पोटी हिना नाहर नारो सिंग अंश (बदलून घेतलेलं नाव) घरी परतला नाही म्हणून तिने काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली त्या प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक ५३१/२९२२ भारतीय दंड विधान ३६३ प्रमाणे दिनांक १/८/०२२ रोजी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याच दिवशी संध्याकाळी फिर्यादिस फोन करून ३५,००,०००/- पस्तीस लाख रुपये खंडणी मागून मुलगा ७ दिवसात परत येईल असे सांगितले होते.
सदर गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अफजल मोहम्मद अन्सारी वय २२ वर्ष २) इम्रान नूरहसन शेख वय २५ वर्ष यांना पोलिसांनी अटक केली, त्यातून खंडणी मागण्याची हकीगत निष्पन्न झाली आहे, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, मोबाईल फोन सिम कार्ड व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा रीतीने २४ तासात आरोपीना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यात भारतीय दंड विधान ३०२,३८७,१२०(ब),२०१ हे कलम वाढवून लावण्यात आले आहेत.
सदरची वाखाणण्याजोगी यशस्वी कामगिरी श्री सदानंद दाते पोलीस आयुक्त, श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त, श्री अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१, श्री विलास सानप सहा पोलीस आयुक्त मिरारोड विभाग, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, वरिष्ठ पो. निरीक्षक श्री संजय हजारे, काशी मीरा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो निरीक्षक प्रकाश गांगुर्डे, पो उप निरीक्षक निखिल चव्हाण, अमोल जाधव, सागर साबळे, प्रकाश कावरे तसेच काशी मीरा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो नाईक विश्वनाथ जरग, पोलीस शिपाई सुधीर खोत, स्वप्नील मोहिले, सोनकांबळे, रवी कांबळे यांनी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करीत आहेत.