
खदानीत सापडलेल्या मृतदेहांचे गूढ उजेडात !!
खदानीत सापडलेल्या मृतदेहांचे गुढ तेल्हारा प्रकटीकरण शाखेच्या पोलीस ठाणे यांनी उलगडले आहे. पोलिसांनी दाखल अकस्मात मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून मित्रानेच पैशाचा तगादा लावला आणि रात्रभर कोंडून ठेवण्याच्या रागातून हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण वन गोसावी यांनी दिली आहे. पांढरी पाडा परिसरातील गुंजाळकर यांच्या खोल दगडाच्या खदानीत १७ जानेवारीला एक मृतदेह सापडला होता. अरबाज राईन यांच्या तक्रारीवरून १८ जानेवारीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
या चौकशीत जाबर पाडा येथील ब्रिजेश चौरसिया वय वर्ष (४१) याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांची बहीण सारिका चौरसिया यांनी भावाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना योग्य त्या सूचना देऊन प्रकरणाची सखल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी सारिका व साक्षीदारांच्या केलेल्या चौकशीत ब्रिजेश याचा मित्र बलराम यादव हे सोबत असल्याचे सांगितले व खदानी मध्ये ब्रिजेश याला बलराम यादव हा धक्का मारून पळून जात असल्याचे सांगितले... बलराम उर्फ बलीराम (२७) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. बलराम ने ब्रिजेश कडून ५५ हजार रुपये घेतले होते. यापैकी २२ हजार रुपये परत देऊन देखील १६ जानेवारीला संध्याकाळी जाबर पाडा येथील राहत्या दुकानात बोलाविले. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तीन लाख रुपये लिहून घेतले. त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवून शिवीगाळ करत व दमदाटी करीत पैसे मागितले. पैशाचा तगादा लावत असल्याचा राग आणि रात्रभर कोंडून ठेवल्याचा राग मनात घेऊन जीव घेण्याच्या उद्देशाने खदानीत ढकलून देऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारल्याचे निष्पन्न झाले.
त्यावर हत्तेचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त जयंत भजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पेलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमार गौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शेगर, वाल्मीक पाटील, संजय मासाळ, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल करपे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी पार केली आहे.