देशासमोर आदर्श निर्माण करण्याची कोकणच्या ग्रामपंचायतींना संधी !!

देशासमोर आदर्श निर्माण करण्याची कोकणच्या ग्रामपंचायतींना संधी !!

    संकटकाळी जो धावून येतो त्याला म्हणतात देव आणि माणुसकी.

                  मग...

     कोकणात जागोजागी असणारी देवस्थाने आंणि माणुसकी गेली कुठे.

     लाखो रुपये खर्च करुन प्रत्येक गावात देवस्थाने उभी केली.

    जत्रा, पालख्या याच्या नावावर लाखो मुंबईकर भाविकांनी या कोकणात कोट्यवधी रुपये खर्च केले. 

                  पण ..

      आज मुंबईकरांना मदत करण्याची वेळ आली तेव्हा कोकणची ही सारी मंडळी केवळ स्वतःच्या घराचे दरवाजेच नाही तर रस्ते बंद करुन शांत बसली. आणि देवळातील गावकर, मानकरी हे ही गायब झाले. त्याच्या गा-हाणाचा आवजही शांत झाला. वास्तविक पहाता कोकणात तशी लागण झालीच  नाही, तरीही लोक घाबरले आणि स्वतःच्याच माणसांना गावबंदी केली. यावरून कोकणी जनतेचा स्वार्थीपणा सर्वांच्या समोर आला.

      कोरोना चा धोका आहे हे सर्वानाच मान्य आहे. याचा अर्थ गावबंदी असा उपाय नाही.

                  उद्या ...

    डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असेच तुमच्या सारखे दडी मारुन बसले तर काय होईल.याचा विचार गावबंदी करणा-या  सर्वानीच  करायला हवा.

                  उद्या....

      मुंबईतील माणसे अशीच तुमच्यासारखी वागली आणि मुंबईच्या जनतेने लक्ष दिले नाही तर काय होईल. म्हणुनच....

     गावबंदी करण्यापेक्षा यावर अनेक उपाय होते.... व भविष्यात ते प्रत्येक ग्रामपंचायतीला करावेच लागतील. कारण ही लढाई एक दोन आठवडयाची नाही, ती पुढील काही महिने सुरुच राहणार. अश्यावेळी सरकारकडे बोट दाखवून उपयोग नाही. कारण आज ना उद्या लॉक डाऊन उठणारच. आणि मुंबई पुण्यातील आपली भावंडे येणारच, त्यावेळी गावातील लोक काय करणार. म्हणुनच आतापासून विचार करुन योजना तयार करयला हवी.

                कसे ते पहा...

    मुंबई, पुण्यातूंन किंवा विदेशातून आलेल्या आपल्या भावंडांना  प्रत्येक ग्रामपंचायतीने  'विलगिकरण" कक्ष निर्माण करुन त्यांची व्यवस्था करणे.

      प्रत्येक गावात मोठाली मंदिरे आहेत आणि या मंदीराशेजारी भली मोठी जागा आहे . येथे प्रतेक ग्रामपंचायतीने सुरुवातीला किमान 50 बेड चे एक "विलगिकरण" कक्ष निर्माण करावेत. हे बेड प्रत्येकानी आपल्या घरातून द्यावे.त्यानंतर मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी आसणा-या आपल्या गावातील भावंडांशी संपर्क साधून ज्यांची येण्याची इच्छा आहे अश्याना वेळ देवून बोलवावे. त्याना देवळातील विलगिकरण कक्षात ठेवावे. आणि गावातील सर्वानीच जात-पात,भांडण तंटे विसरून एकत्र येवून याना जेवण द्यावयचे.

            यातून काय होईल...

सदर व्यक्तीला आपल्या गावातील देवळातच राहिल्याने त्याला मानसिक समाधान लाभेल आणि त्याच्या रोग्प्रतीकार शक्तीत वाढ होईल.

आपल्या बालपणीच्या मित्राना, जवळच्या आप्ताना भेटल्याने त्याला आनंद होईल.

       शेवटी कोरोना हे एक युध्द आहे, आजपर्यंत युध्द सीमेवर होत होते पण काळ बदलला त्यामूळे प्रत्येकाच्या दरवाज्याकडे हे युध्द पोहचले आहे. या युध्दात सरकार, पोलिस, डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा सर्वच लढत आहेत.त्यांची लढाई एकाकी असता कामा नये.  म्हणुनच आपण सर्वानी समजूतदार पणे एकत्रीत आलो तर आणि तरच कोरोनाला हरवू शकू.

       चला तर......प्रत्येकाने ठरवुया आणि एकेकाचे प्राण वाचवूया

         कोकणाला ही संधी आहे म्हणूनच कोकणच्या जनतेने पुढाकार घ्यावा. गावाक-याच्या या लढ्यात प्रत्येक मुंबईकर सामिल होईल याची खात्री आहे. हे काम करुन प्रत्येक ग्रामपंचायतिने देशासमोर आदर्श निर्माण करावा. अशा ग्रामपंचायातीला पुढील काळात सरकारने आदर्श ग्रामपंचायत ठरवून त्यांना विशेष निधी द्यावा. तरच देवळातील भक्तिला खरी शक्ती मिळेल आणि देवळातील देवाची खऱ्या अर्थाने पूजा होईल.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week