ठाकरे होतील का कठोर ?

ठाकरे होतील का कठोर ?

      करोना साथीचा संपूर्ण सरकारी यंत्रणा सामना करून साथ नियंत्रणात आणण्याकरीता प्रयत्न करताना दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातल्या यंत्रणेने करोना वर चांगला ताबा मिळवला आहे. पण त्यात करोना प्रसार वाढतच आहे. महाराष्ट्रात करोना बरे होण्याची संख्या ही वाढत आहे. यात नियंत्रिण ठेवण्यात यशस्वी झालेले संयमी, संवेदनशील मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांची कार्यशैली पाहून त्यांची अनेक क्षेत्रात वाह वाह होत आहे. करोना वर सरकारचे नियंत्रण पाहता काही नतद्रष्ट हितशत्रू सरकारला साथ देण्याऐवजी सरकारला संकटात टाकण्याच्या हिरीरीने प्रयत्न करीत आहेत. नको तो बाऊ करून सरकार वर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना नाव न घेता विरोधकांना इशारा देतांना महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात असून, मी राजकारणाचा मास्क बाजूला करून ह्याचे उत्तर देईन. शेवटी अनिष्ट गोष्ट खपवून घेणार नाही, कठोर कारवाई करू असे संवाद मुख्यमंत्री साधत आहेत.

       पण ठाकरेंच्या स्वभाव नुसार ते कठोर पावले उचलणार नाहीत ह्याची हित शत्रूंना कल्पना असावी म्हणुन त्याचा दुरुपयोग केला जात आहे असे लक्षात येते. महसूल साठी दारू बंदी शिथिल केल्यावर दारु घेण्यासाठी गोंधळ झाला. सोशल डिस्टँसिंग अंमलात न आणणारे डॉक्टर, पोलिसांवर हल्ले होत असताना, सरकार एक, एक बंधने खुली करत आहेत. मास्क घालणाऱ्यांना १४४ कलम लावून ही रस्त्यावर फिरणाऱ्यांना सोशल डिस्टन्स चे नियम न पाळणाऱ्या लोकांवर जबरी दंड ठोठावण्याची कारवाई, राज्य शासनाने खंबीरपणे पार पाडली तर करोना आटोक्यात येईल. करोना आटोक्यात येण्यासाठी त्याची चैन तुटणे आवश्यक आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्स मुळे ही चैन तुटल्याचे जगात उदाहरणे आहेत. करोना विरुद्ध लढाई जिंकणे ही एक राष्ट्रीय जवाबदारी आहे. करोनाशी लढतांना अर्थकारणाचा गाडा ही रुळावर येण्यासाठी जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, ही तारेवरची कसरत करताना माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे हाथ जोडून सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकप्रियतेत मुख्यमंत्री म्हणून पहिला क्रमांक मिळाला आहे. तरी शासकीय नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करावी. तरच करोना वर विजय प्राप्त होऊ शकेल त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्णय घेण्यास हवे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week