
भांडणाची अडी धरली मनात, दोन मित्रांनी जिवलग मित्राचा केला खून !!
भांडणाची अडी धरली मनात, दोन मित्रांनी जिवलग मित्राचा केला खून !!
खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूच्या जंगलामध्ये मृत देह फेकणाऱ्या आरोपिस अटक.
दिनांक ६ जानेवारी २२ रोजी अहमदाबाद महामार्गावर सकवार गावच्या हद्दीत श्रीजी पेट्रोल पपंच्या काही अंतरावर अहमदाबादकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एक प्रेत आढळून आले. पोलिसांनी सदर प्रेताची चौकशी केली असता सदर प्रेत हे मयत दिपक फिरतु भारद्वाज याच असल्याचं समजलं. सदर गुन्ह्याचा गांभिर्याने कसून तपास केला असता शाखा कक्ष ३ यांच्या अंमलदार व अधिकारी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि तांत्रीक विश्लेषणा द्वारे ही माहिती मिळाली की हरिशंकर उर्फ गौरीशंकर रामशरण निषाद वय वर्ष ३० राहणार यादव नगर रघुवीर स्कुलच्या समोर बोईसर पूर्व तालुका डहाणू जिल्हा पालघर मुळग्राम तुलसीपूर थाना धाता, जि फतेपुर ह्याने आपला मित्र मयत दिपक फिरतु भारद्वाज हयाच्या सोबत व्यापारातून झालेल्या भांडणावरून मनात राग धरून ठेवला होता.
दिनांक ६ जानेवारी रोजी २२ रोजी मयत दिपक हा विरार वरून बोईसर येथे परत येत असताना हरिशंकर उर्फ गौरीशंकर निषाद याने आपल्या मित्राच्या मदतीने दिपक भारद्वाज यास जीवे ठार मारले व केलेला खूनाचा गुन्हा लपवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात फेकुन दिले.
पोलिसांनी २० दिवस अथक परिश्रम घेऊन जि फतेपुर राज्य उत्तर प्रदेश येथील विविध भागात शोध घेऊन खून करून फरारी झालेल्या हरिशंकर उर्फ गौरीशंकर राम शंकर निषाद ह्याला ताब्यात घेऊन विरार पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी डॉ. महेश पाटील उप आयुक्त गुन्हे, अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे मिरा-भाईंदर वसई- विरार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमोद बडाख पोलिस निरीक्षक, उमेश भागवत पोलिस उप निरीक्षक, शिवाजी खाडे पोलीस हवालदार, अशोक पाटील पोलिस नाईक, मनोज सकपाळ, मनोज चव्हाण, शंकर शिंदे, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, पोलीस शिपाई राकेश पवार, अश्विन पाटील गुन्हे शाखा ३ यांनी पार पाडली.