
हिंदवी स्वराज्य आणि मजबुत पोलीस यंत्रणा असताना अजूनही गँगस्टरचा आतंक ??
हिंदवी स्वराज्य आणि मजबुत पोलीस यंत्रणा असताना अजूनही गँगस्टरचा आतंक ??
महाराष्ट्र राज्य सरकार व मुंबई पोलीस यंत्रणा इतकी मजबूत असताना देखील अजूनही काही ठिकाणी गँगस्टर द्वारा आतंक फैलावण्याच्या काही घटना उघडकीस येत आहेत आणि सामान्य माणसाची सुरक्षा ह्या गँगस्टर मुळे कठीण होऊन बसली आहे. सामान्य माणूस ज्याला सरकार व पोलीस यंत्रणा सुरक्षिततेची हमी देते पण अस निदर्शनास येत की सरकार व मुंबई पोलीस यंत्रणा नागरी सुरक्षिततेस कुठे तरी कमी पडत आहेत ! ही खेदाची बाब आहे. निवडणुकी दरम्यान मत वाढविण्यासाठी काही नेत्यांनी मुंबईत अनेक झोपडीपट्टी वसविल्या परंतू मतदाना पुरत्या त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा वापर करण्यात येतो. मग इतर वेळेस तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेच काय ? हा मोठा प्रश्न भेडसावत आहे. मग अशा प्रशासन व नेत्यांकडून दुर्लक्षित झालेल्या विभागातुनच गँगस्टर्स निर्माण होतात आणि ह्या गँगस्टर्स कडे बंदुका पिस्टल कुठून येतात ते स्वतः खरेदी करतात की त्यांना कोणी अग्निशस्त्रे पुरविते ? हा ही प्रश्न उभा राहतो.
आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे गँगस्टर्स सर्रास सामान्य माणसाचा खून करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात स्थानिक प्रशासन व्यवस्थेला कुठेतरी गालबोट लागत आहे. अशीच प्रशासन व्यवस्थेला गालबोट लावणारी घटना धारावी येथे घडली.
दिनांक १२ फेब्रुवारी २२ रोजी सकाळी १०.३० वाजता ते १०.४५ च्या दरम्यान घडली. अमीर अनिस खान हे धारावी परिसरात मारुती चाळीच्यामागे असलेल्या खाडीच्या बाजूला पिवळा बंगला, राजीव गांधी नगर, धारावी मुंबई येथे शौचास गेले असताना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी टोळी प्रमुख कलीम रौफ सय्यद वय वर्ष २७ राहणार धारावी मुंबई व आरोपी क्र.३ पुरुष वय २३ वर्ष राहणार धारावी मुंबई यांनी त्यांच्याकडे असलेल्या अग्निशस्त्रातून मयत इसम अमीर खान यावर एकूण ०८ राउंड फायर करून त्याचा खून केला. म्हणून धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा कक्ष ५ कार्यालयाच्या मार्फतीने तपास करीत येत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी टोळीप्रमुख, कलीम सय्यद रौफ याने धारावी परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे कृत्य केलं अस निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आरोपिताचा शोध घेत असताना त्याचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. तसेच आरोपी इसम हे मुंबई येथील मूळ रहिवाशी नसल्याने व परिसरात त्यांची दहशत असल्याने त्यांच्या बद्धल उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक माळी, सहायक पोलिस निरीक्षक जाधव व पथक यांनी सोशल मीडिया व जुन्या वापरत्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे आरोपी क्रमांक २ व टोळीप्रमुख कलीम सय्यद याला सुरत राज्य गुजरात येथून तसेच आरोपी क्रमांक ३ पुरुष इसम वय वर्ष २३ राहणार धारावी मुंबई, आरोपी क्रमांक ४ पुरुष इसम वय वर्षे २० राहणार ठिकाण वडाळा मुंबई यांना मुंब्रा परिसर ठाणे, कुर्ला परिसर मुंबई व वडाळा परिसर मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सदर आरोपीकडे चौकशीत असे निष्पन्न झाले की टोळी प्रमुख हा MCOCA गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असून तो सध्या अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात ऑर्थर रोड कारागृहात जेरबंद आहे. नमूद टोळीप्रमुख यास धारावी परिसरात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. म्हणून त्याने मागील एक महिन्यांपूर्वी न्यायालयीन तारखेच्या वेळी आरोपी क्रमांक २ ते ७ व गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी यांच्यासह आमीर खान याचा नियोजन बद्ध कट रचला होता. त्याप्रमाणे टोळीचे हस्तक यांनी अलीगड, कलकत्ता येथून अग्नीशस्त्र प्राप्त केले होते. त्या अनुषंगाने मयत इसम अमीर खान यावर ठरल्या कटाप्रमाणे पाळत ठेऊन तो शौचास गेला असताना आरोपी २ आणि ३ यांनी फायरींग करून त्याचा खून केला. तसेच सदरची टोळी ही 'K COMPANY' या नावाने दबदबा निर्माण करून संघटित गुन्हेगारी चालवीत असल्याचे दिसून आले.
नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीतांनी वापरलेले दोन पिस्टल, एक गावठी कट्टा व १५ जिवंत काडतुसे तसेच दोन चॉपर, एक कोयता हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आरोपितांनी गुन्हा करून घटनास्थळावरून पलायन करते वेळी वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. अश्या प्रकारे गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला याचा कोणत्याही प्रकारे सुगावा लागत नसताना तांत्रिक ब गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष ५ यांनी अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील आरोपितांना अटक करून गुन्ह्याची उकल केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई श्री मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.एस विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. निलोत्पल, मा. सहायक पोलिस आयुक्त (मध्य) श्री. नामदेव शिंदे, मा सहायक पोलिस आयुक्त (दक्षिण) श्री. सोपान निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत बंडगर, सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माळी, सहायक पोलिस निरीक्षक जयदीप माळी, पोलीस उप निरीक्षक लक्ष्मण वडरे, सहायक फौजदार यादव, सहायक फौजदार साळुंखे, सहायक पोलिस आयुक्त न्यायनिर्गुणे, सहायक फौजदार भुजबळ, पोलिस हवालदार राणे वांयगणकर, देसाई घाडगे, निरभवणे, विचारे, पोलिस नाईक सिंग, चिलप, पाटील, जाधव पोलीस शिपाई फुंदे, काळे, मुलाणी, सावंत, पाटील महिला पोलीस नाईक शिंदे, साळवी, पाटील तसेच सहायक फौजदार/चालक घोरपडे, पोलीस नाईक कांबळे यांनी यशस्वी केली.