
मर्डर! दारू बनली मृत्यूला कारण !!
माणूस धुंद नशेमध्ये काय करतो हे त्यालाच कळत नाही. म्हणतात बाई आणि बाटली च्या नादात माणूस स्वतःचा सर्वनाश करून घेतो. भले भले सेठीया दारू और चमडी के पिछे बरबाद हो गये है। पिणाखाण्याच्या नादात वाद होतात, आणि कधी कधी त्या वादातून मारामारी, खूनही होत असतात. अशीच एक खुनाची घटना घडली.
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास श्री भुमैय्या मालैय्या मायकेल, वय वर्ष ५५ धंदा बांधकाम, राहणार ठिकाण आंबेडकर चाळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, साईबाबा मंदिराजवळ मानखुर्द. यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी व फिर्यादी यांचा मुलगा अंजु हा अण्णाभाऊ साठेनगर येथील पादचारी पुलाजवळ बि. नं. ५१ समोरील परिसरात पी. एम. जी. पी. कॉलनी, मानखुर्द येथे रात्री दारू पित बसले होते.
दारू पिण्याच्या कारणावरून दोघात वाद झाले असता, अटक आरोपी याने मयत अंजु ह्याच्यावर धारधार चाकूने छातीवर व पाठीवर वार करून त्यास जीवे ठार मारले. म्हणून फिर्यादी भुमैय्या मायकेल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजि.५२ कलम ३०२, भारतीय दंड विधान सह कलम, ३७ (१) (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला.